मंत्री येणार, म्हणून स्वच्छता; सरनाईक कडाडले
कोल्हापूर बस स्थानकाच्या पाहणीदौऱ्यात सर्वत्र स्वच्छता आढळली, हे पाहून आता दौरे बंद करावे लागतील, असे म्हणाले, सोबतच मंत्री दौऱ्यावर येणार असल्यामुळे रात्रीत येथे स्वच्छता झाल्याचे समजताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले स्थानकातील कॅन्टीनच्या पाहणीदरम्यान खाद्यपदार्थांच्या दरपत्रकावर चक्क चिकटपट्ट्या लावून मूळ दर झाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून मंत्र्यांचा पारा चढला. त्यांनी विभाग नियंत्रक अभय देशमुख आणि व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांना सर्वांसमोर धारेवर धरले.
दर चार तासांनी स्वच्छता अनिवार्य
बस स्थानकाचा परिसर आणि स्वच्छतागृहे केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजेत, त्यासाठी दर चार तासानी स्वच्छता करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश त्यानी प्रशासनाला दिले. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, कोल्हापूर विभाग नियंत्रण अभय देशमुख, प्रादेशिक परिवहन व्यवस्थापक आमृता ताम्हणकर यांना धारेवर धरले. स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. गरजूंसाठी 30 रुपयांत नाश्ता देण्याची योजना सुरू करण्याचे आदश दिले.
66 गोरगरीब प्रवाशांना 30 रुपयात नाश्ता मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यात कसलीही आडकाठी खपवून घेतली जाणार नाही. तसेच स्वच्छता ही नियमित प्रक्रिया असायला हवी.
– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
बसस्थानकांचे उद्घाटन
प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो, त्यामुळे आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शासन निधीतून बांधण्यात आलेल्या चार नूतन बसस्थानकांच्या उद्घाटनासाठी मंत्री सरनाईक कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छतागृहांची पाहणी केली.






