मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्दावर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आंदोलन अद्याप थांबवण्यात आलेलं नाही. त्यातच मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. तर काही दिवसांत मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये कॅबिनेटची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, समिती खुप झाल्या आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी आपले प्राण पणाला लावून उपोषण करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडत चालले आहे. जे केंद्र सरकार विशेष अधिवेशन घेत आहे त्यात हा विषय आला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.
सरकारला मराठवाड्यातील कैबिनेट आधी हे सगळं गुंडाळायचं. लोकांनी विरोध करू नये, यांच्या गाड्या फोडू नयेत, रस्त्यावर उतरू नये यासाठीच हे सारं सुरूय कालच्या बैठकीचा कुणाला काही पडलेलं नाही, त्यातून काहीच साध्य झालं नाही केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनात हा विषय आला पाहिजे अशी टिका संजय राऊतांनी सरकारवर केली आहे. जी -२० आलेल्या प्रत्येक देशाला भारतातून काहीतरी मिळवून देण्याचं अमिष दाखवलं गेलं, म्हणून ते आले. सगळे राष्ट्रप्रमुख त्यासाठीच आले होते. जो बायडेनसोबत केलेला करार प्रकाश आंबेडकरांनी पुराव्यासकट दिला होता. सौदीच्या राजकुमारासोबत केलेला बारसूचा करारही त्याचाच एक भाग आहे अशी टीका संजय राऊतांनी सरकारवर केली.
पुढे ते म्हणाले. माजी लष्कर प्रमुखांनी असं बेजबाबदार वक्तव्य करू नये. आधी लडाख ची जमीन चीन ने बळकावली आहे ती ताब्यात घ्या. आधी लडाख, अरूणाचल इथला विवादीत भाग भारतात आणा. इंडिया आलायन्स मध्ये कोणताही मतभेद नाही असे संजय राऊत म्हणाले.