(photo -Social Media)
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील हे सातत्याने आंदोलन करताना दिसत आहेत. यावरूनच आता शिवसेना (ठाकरे गट) संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. कोर्टाचा निर्णय काय आहे हे मला कळले नाही. कोर्टाने आंदोलन करण्यापासून रोखले नाही. पण परवानगीशिवाय आंदोलन करू नका. परवानगी कोणाची तर सरकारची. मग आंदोलनाचा हक्क आणि अधिकार राहिला कुठं?
खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, कोर्टाचा निर्णय काय आहे हे मला कळले नाही. कोर्टाने आंदोलन करण्यापासून रोखले नाही. पण परवानगीशिवाय आंदोलन करू नका. परवानगी कोणाची तर सरकारची. मग आंदोलनाचा हक्क आणि अधिकार राहिला. आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकारने त्यांच्या आंदोलनाची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना योग्य जागा द्यावी. सरकार काय सांगते कळत नाही आणि कोर्टाची भाषा आम्हाला कळत नाही, असे ते म्हणाले.
तसेच काल मी मराठवाड्यात होतो. दोन दिवस संपूर्ण मराठवाडा खदखताना मला दिसला मराठवाड्यामध्ये कोरडा दुष्काळ आहे आणि हा दुष्काळ अत्यंत चिंताजनक आहे. जी पीक शेतकरी तिकडे घेत आहेत, सोयाबीन असेल किंवा अन्य काही असेल ही अक्षरश: जळून गेली आहेत, 60 दिवसांपेक्षा जास्त इथे एक पाण्याचा थेंब पडलेला नाही.
‘मधल्या काळामध्ये उदय सामंत जात होते ते काय करत होते. म्हणून तुम्हाला आता बाळासाहेब ठाकरे यांचे महत्त्व आता कळेल. यांचे या महाराष्ट्रात जे काही महत्त्व होतं ते हेच महत्त्व आहे. त्यांनी 18 पगड जातींना एकत्र करून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारली आणि मराठी म्हणून सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला म्हणून ही एकजुटीची वज्रमूठ अमित शहा यांनी फोडली आणि देवेंद्र फडणवीस यांचा जातीय राजकारण जबाबदार आहे. हे अमित शहा यांचे पाप आहे.
सरकार अहंकारात बुडाले
सरकार पण आता अहंकारांमध्ये बुडाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत कोणी मेला गेला तरी मला फरक पडत नाही, अशा मनस्थितीमध्ये आहे लंडनमध्ये जे सरकार करत आहे ते म्हणतात मला शिव्या घातल्या मी बोलणार नाही.






