Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

आता शहरांमधील दुकाने आणि हॉटेल्स २४ तास सुरू ठेवता येणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांसाठी मोठी सोय होणार आहे. मात्र, या नियमातून मद्यपानगृहे (Bars), हुक्का पार्लर, परमिट रूम आणि देशी बार यांना वगळण्यात आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 01, 2025 | 09:52 PM
मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली (Photo Credit -Social Media)

मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली (Photo Credit -Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली
  • सरकारचा मोठा निर्णय
  • कायद्यानुसार काय आहे तरतूद?

मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, आता शहरांमधील दुकाने आणि हॉटेल्स २४ तास सुरू ठेवता येणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांसाठी मोठी सोय होणार आहे. मात्र, या नियमातून मद्यपानगृहे (Bars), हुक्का पार्लर, परमिट रूम आणि देशी बार यांना वगळण्यात आले आहे. हे व्यवसाय पूर्वीप्रमाणेच ठरलेल्या वेळेनुसार सुरू राहतील. हा निर्णय राज्याची ‘रात्रीची अर्थव्यवस्था’ (Night Economy) वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

कायद्यानुसार काय आहे तरतूद?

‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७’ नुसार, दुकाने २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी आहे. या कायद्यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:

  • ‘दिवस’ म्हणजे काय? – कायद्यानुसार, ‘दिवस’ म्हणजे मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी.
  • कर्मचाऱ्यांची सुट्टी – जरी आस्थापना आठवड्यातून सातही दिवस सुरू राहिल्या, तरी प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून २४ तासांची सलग विश्रांती (साप्ताहिक सुट्टी) मिळणे आवश्यक आहे.

या कायद्यानुसार, कोणतीही दुकान किंवा आस्थापना २४ तास सुरू ठेवण्यास कायदेशीर अडचण नाही. मात्र, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून अनेक ठिकाणी याला विरोध होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

या आस्थापना २४ तास सुरू राहणार नाहीत

शासनाने हे देखील स्पष्ट केले आहे की, काही विशिष्ट प्रकारच्या आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी नाही. २०२० च्या अधिसूचनेनुसार, या आस्थापनांसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे.

  • परमिट रूम, बिअर बार, डान्सबार आणि डिस्कोथेक
  • हुक्का पार्लर
  • कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री किंवा पुरवठा करणारी दुकाने

सरकारचा स्पष्ट संदेश

या सर्व तक्रारींची दखल घेऊन, सरकारने स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाला एक स्पष्ट संदेश दिला आहे. दारू विक्री किंवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना वगळून इतर कोणत्याही दुकानांना २४ तास सुरू ठेवण्यापासून रोखू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि नागरिकांसाठी मोठी सोय झाली आहे.

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Web Title: Shops in the state will now remain open 24 hours governments big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 09:40 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • State Governments

संबंधित बातम्या

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
1

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर
2

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
3

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय
4

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.