
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; शाळा-कॉलेजांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी
‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत आमदार विक्रम पाचपुते आणि राहुल कुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या स्टिंगची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात येते. सोशल मिडियाद्वारेही याचा प्रसार होत असतो. मात्र स्टिंगच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाइन अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, पाथडी येथे मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून शासन यावर निर्बंध आणणार का, अशी विचारणा विक्रम पाचपुते यांनी केली. ‘स्टिंग’ एनजीं ड्रिंकमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवणारे कॅफिन, अतिप्रमाणातील साखर आणि कृत्रिम रंग यांसारखी घातक रसायने व घटक किती प्रमाणात आढळतात याची अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने तपासणी केली आहे काय? असाही प्रश्न पाचपुते यांनी केला.
शाळांच्या पाचशे मीटर परिघात बंदी
शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या पेयाच्या अतिसेवनामुळे हृदयविकार, निद्रानाश, किडनीचे आजार आणि अलीकडेच काही विद्यार्थ्यांचा तरुणांचा मृत्यूही झाल्याच्या घटना समोर आल्या असल्याची बाब विक्रम पाचपुते यांनी यावेळी निदर्शनास आणली. त्यामुळे या पेयाच्या बाटलीवर लहान मुलांसाठी शिफारस केलेली नाही. असा इशारा असूनही त्याची सर्रास विक्री शाळा-कॉलेजव्या कॅन्टीनमध्ये व कॅम्पस परिसरात याची विक्री केली जात आहे. यावर पूर्ण बंदी घालण्यासाठी आणि याच्या जाहिरातीवर निबंध आणण्यात यावेळी अशी मागणी पाचपुते यांनी यावेळी केली. त्यावर या पेयाच्या बाटलीवर गरोदर महिला किंवा स्तनदा माता, लहान मुले आणि कॅफिनची ऍलर्जी असलेले व्यक्ती यांच्यासाठी अयोग्य असे स्पष्ट अक्षरात लिहण्याचे बंधनकारक करण्यात आले असून शाळांच्या पाचशे मीटरच्या परिघात या पेयाच्या विक्रीला बंदी घालण्यात येणार असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
आंबेनळी घाट पुढील चार दिवस वाहतुकीसाठी बंद; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
एनर्जी ड्रिंक आणि भेसळीचीही चौकशी
भाजप आमदार राहुल कुल यांनीही सभागृहात आणखी गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांनी शाळांच्या परिसरात एनर्जी ड्रिंक्स, फ्लेवर पानाच्या नावाखाली अंमली पदार्थाची विक्री, तसेच फ्लेवर मिल्कच्या नावाखाली जास्त साखर आणि कृत्रिम पदार्थांचा वापर होत असल्याचा आरोप केला. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले की, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व बाबींची तपासणी सुरू असून दोर्षीवर कारवाई केली जाईल.