Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर कारखानदारांची ‘काटामारी’, वजनात तफावत; ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

एका बाजूला पावसाच्या अनिश्चिततेमुळे ऊसाचे उत्पादन घटले तर दुसऱ्या बाजूला साखर कारखानदार करत असलेल्या काटामारीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 25, 2025 | 12:17 PM
साखर कारखानदारांची ‘काटामारी’, वजनात तफावत; ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

साखर कारखानदारांची ‘काटामारी’, वजनात तफावत; ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Follow Us
Follow Us:
  • साखर कारखानदारांची ‘काटामारी’
  • उसाच्या वजनात तफावत
  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
कोल्हापूर/दीपक घाटगे : यावर्षी ऊस गळीत हंगामाच्या तोंडावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एका बाजूला पावसाच्या अनिश्चिततेमुळे उत्पादन घटले तर दुसऱ्या बाजूला साखर कारखानदार करत असलेल्या काटामारीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. काटामारी म्हणजे ऊसाचे वजन कमी दाखवणे किंवा तुटवडा दर्शवून कमी दर देणे, या पद्धतीने अनेक कारखाने शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे मागील गळीत हंगामात सिद्ध झाले आहे .

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ऊसतोड झाल्यानंतर वजनकाट्यावर दाखवले जाणारे वजन आणि शेतकऱ्यांच्या शेतात घेतलेले वजन यामध्ये मोठा फरक दिसून येतो. काही ठिकाणी तर प्रति टन ३० ते ५० किलोपर्यंत ऊस कमी दाखवला जातो. यामुळे प्रति टन सरासरी १५० ते २०० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. संपूर्ण गळीत हंगामात हे नुकसान हजारो रुपयांपर्यंत पोहोचते.
शेतकरी संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदविला असून, काटामारीसाठी जबाबदार असणाऱ्या कारखाना यंत्रणेवर कारवाईची मागणी केली आहे. ऊस वजनासाठी कारखान्यांकडून वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक काट्यांवर विश्वास राहिलेला नाही. अनेक ठिकाणी काट्यांचे कॅलिब्रेशन वेळेवर न करता शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे.

याशिवाय, काही कारखाने वाहतुकीचे खर्च वजा करून ऊसदर अदा करतात, तर काही ठिकाणी तोडणी व वाहतूक मजुरांच्या नावाखालीही अनधिकृत कपात केली जाते. परिणामी एफआरपीची दर असूनही शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्षात मिळणारा दर खूपच कमी राहत आहे.
यंदा गळीत हंगामाचा प्रारंभ १ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून, ऊस तोडणीसाठी माळरानावर ऊसतोड मजुरांनी आपल्या छावण्या उभ्या करण्यास सुरुवात केली आहे. ट्रॅक्टर चालकांनीही आपली वाहने सज्ज ठेवली आहेत. काही दिवसात ऊस तोडणी हंगामाची लगबग सुरू होणार आहे, मात्र काटामारी थांबणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

‘ऑनलाइन प्रणाली’वर साशंकता

राज्यातील काही प्रगत साखर कारखान्यांनी पारदर्शकता राखण्यासाठी ‘ऑनलाइन वजन प्रणाली’ सुरू केली आहे. या प्रणालीत शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर ऊस वजनाची पावती तात्काळ मिळते. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी अद्यापही जुनी पद्धत ठेवली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास कमी होत चालला आहे.

निरीक्षण समित्या स्थापन कराव्या

साखर कारखानदारांनी प्रामाणिक ऊसाचे वजन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. राज्य सरकारने याबाबत निरीक्षण समित्या स्थापन करून काटामारी रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

काटामारीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत होत असून, पुढील वर्षी ऊस लागवड कमी होण्याची शक्यता आहे. ऊस उद्योगाचे चक्र चालविण्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास टिकवणे ही कारखानदारांची जबाबदारी आहे. – शिवाजी माने, अध्यक्ष, जय शिवराय किसान संघटना

Web Title: Sugar mills are causing financial losses to farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Raju Shetti
  • Sugarcane

संबंधित बातम्या

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी
1

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार
2

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
3

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.