Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळजी घ्या ! यंदा उष्णतेच्या सर्वाधिक बसणार झळा; विदर्भात तापमान 48 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज

दोन दशकांत हवामानातील बदल अधिक तीव्र झाले आहे. अतिवृष्टी, तीव्र उष्णता आणि थंडीच्या लाटांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात रोगराई व महामारीसारख्या समस्या वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2026 | 10:52 AM
देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस...

देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस...

Follow Us
Follow Us:

नागपूर : सध्या वातावरणात सातत्याने बदल पाहिला मिळत आहे. त्यातच यंदा उन्हाळा आतापर्यंतच्या उन्हाळ्यांमधील सर्वाधिक तापमानाचा ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जानेवारीच्या अखेरीपासून आणि मार्चच्या सुरुवातीलाच तापमानात झालेली वाढ आतापर्यंतच्या नोंदींमधील महत्त्वाची बाब असल्याची माहिती हवामान अभ्यासकांकडून देण्यात आली.

दोन दशकांत हवामानातील बदल अधिक तीव्र झाले आहे. अतिवृष्टी, तीव्र उष्णता आणि थंडीच्या लाटांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात रोगराई व महामारीसारख्या समस्या वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात २००१ नंतर हवामान बदलाचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसू लागले. २०२० नंतर हवामान बदलाच्या घटना वाढल्या आहेत. १९९५ ते २०२५ या कालावधीत देशात सुमारे ४५० मोठ्या हवामानाशी संबंधित घटना घडल्याची नोंद आहे. जागतिक हवामानावर प्रभाव टाकणाऱ्या एल निनो आणि ला निनो या घटकांमुळेही तापमानातील चढउतार वाढत आहे.

हेदेखील वाचा : Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज, एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी

फेब्रुवारी २०२६ पासून ला निनोचा प्रभाव कमी होत असून, सध्या न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही स्थिती जुलैपर्यंत कायम राहू शकते. त्यानंतर वर्षाच्या मध्यापासून एल निनो सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बदलांचा परिणाम म्हणून काही भागांत उष्णतेची तीव्रता वाढू शकते तर काही ठिकाणी पावसाच्या पद्धतीत बदल दिसू शकतो. त्यामुळे येत्या काळात हवामानातील अनिश्चितता वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

२०२२ हे वर्ष भारतातील ५० वर्षांतील सर्वाधिक उष्ण लहरींचे वर्ष ठरले होते. महाराष्ट्रातही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे येथे तापमान ४१.८ अंश, मुंबईत ४१ अंश, नागपुरात ४६ ते ४८ अंश, चंद्रपूरमध्ये ४९ तर यवतमाळमध्ये ४६.६ अंशांपर्यंत तापमान जाऊ शकते. विशेषतः विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

उष्णतेचा आरोग्यावरही परिणाम

राज्यासह पुणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका बसू लागला आहे. नेहमी एप्रिल-मे महिन्यात जाणवणारी उष्णतेची तीव्रता यंदा मार्चमध्येच जाणवत आहे. त्यामुळे शेती, पशुधन, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Web Title: Temperatures are expected to reach 48 degrees in vidarbha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Climate Change
  • Temperature Increase
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…
1

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
2

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
3

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….
4

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.