
येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. उद्या म्हणजे 11 नोव्हेंबर रोजी कल्याण शहरात होणाऱ्या पाणीकपातीमुळे नागरिकांनी आधीच याची खबरदारी घ्यावी असं आवाहन पालिकेकडून करण्यात आले. याचं कारण म्हणजे मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे पाणीकपात करण्यात येत आहे. सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत तब्बल 12 तास बंद करण्यात येणार आहे.
पालिकेच्या माहितीनुसार, उल्हासनदी काठच्या शहरांचा पाणीकपात होणार आहे. मोहिली जलशुद्धीकरणत केंद्रातील पाणी हे टिटवाळा, वालधुनी, कल्याण पश्चिमकल्याण पूर्वेतील वालधुनी परिसर, कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसर, उपप्रादेशिक परिवहन विभाग परिसर, टिटवाळा अ प्रभाग क्षेत्रातील मांडा, टिटवाळा मोहने, आंबिवली, धाकटे शहाड, शहाड, बंदरपाडा वडवली परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दरम्यान, 12 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीपुरवठा आपल्या घरात करून ठेवावा, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.