airport (फोटो सौजन्य: social media )
२६ मे रोजी मुंबई जोरदार पाऊस पडला. अनेक रेल्वे रुळावर आणि रस्त्यावर पाणी साचलं. त्यामुळे जण जीवन विसकळीत झालं. वाहतूक ठप्प झाली. लोकल ट्रेन सकाळपासून उशिराने धावत होती आणि संततधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी साचल्याने लोकल सुद्धा बंद करण्यात आली. पावसामुळे अनेक विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली. एयर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटकडून विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइट शेड्यूलचे ऑनलाइन अपडेट पाहण्याचा सल्ला दिला आहे. प्रवाशांसाठी आमची टीम विमानतळावर सतत कार्यरत आहे, अशी एडवाइजरी या कंपन्यांनी जरी केली आहे. त्याचवेळी अमरावती मधून एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. विमानतळावरून प्रवासी विमानात बसले, सीटबेल्ट सुद्धा बांधले. परंतु त्याच क्षणी असं काही घडलं की वेळेत विमान रद्द करावं लागलं. नेमकं काय घडलं?
टँकर मातीत फसला
अमरावतीवरून विमान मुंबई कडे रवाना करण्यात येणार होता. प्रवासी विमानात बसले, सीटबेल्ट सुद्धा बांधले, परंतु पेट्रोल न मिळाल्यामुळे अमरावतीवरून मुंबईकडे येणारे विमान वेळेत रद्द करण्यात आले. विमानामध्ये पेट्रोल भरणारे टँकर अमरावती विमानतळावरील मातीत फसले. यामुळे विमानात पेट्रोल भारत आले नाही. त्यामुळे थेट विमान वेळेत रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाश्यांमध्ये संतापाची भावना आहे.
नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या विमानतळावरून नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेचारच्या सुमारास ७४ प्रवासी विमानाने मुंबईला जाणार होते. मुंबईकडे जाणारे प्रवाशी विमानतळावर पोहोचले. सर्व प्रक्रिया पार पडली. विमानाच्या पायलटने सर्व प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी दिली. प्रवाशांनी आपले सीटबेल्ट सुद्धा बांधले.याचदरम्यान पायलट कॉकपीटमधून बाहेर आला आणि त्याने सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगितले.पेट्रोल वेळेत मिळाले नाही, आता सायंकाळ झाल्याने आणि नाईट लँडिंगची सुविधा नसल्यामुळे विमान उड्डाण करणार नसल्याचे पायलटने प्रवाशांना सांगितले. त्यानंतर अनेक प्रवाशांनी विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घातला. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही.
प्रवाश्यांमध्ये संतापाचा वातावरण
अमरावती विमानतळावर नेहमी टँकरद्वारे विमानात पेट्रोल भरले जाते. परंतु, काल सोमवारी (२६ मे) पेट्रोलचा टँकर मातीत फसला आणि नियोजित वेळेत विमानात पेट्रोल भरता आले नाही. अमरावतीत विमानतळ थाटामाटात सुरु करण्यात आले होते. परंतु विमानतळावर पेट्रोल भरण्याची सुविधा सुरु केली गेली नाही. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये संतापाचा वातावरण आहे.