Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजचा भाजप बदलला आहे, आजचा भाजप सर्व जाती धर्माचा पक्ष आहे – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर ताबा करण्यात आला होता. मात्र शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 01, 2024 | 11:39 AM
आजचा भाजप बदलला आहे, आजचा भाजप सर्व जाती धर्माचा पक्ष आहे – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Follow Us
Follow Us:

मी योग्य दिशेने पुढे चाललोय त्यामुळे तरुणांनी माझ्यासोबत यावं, बीजेपी सोबत असलो तरी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर अशी युती केली आहे. एकट्याच्या ताकदीवर सत्तेत येणं शक्य नसेल तर मित्र पक्षाच्या ताकदीवर पुढे आलं पाहिजे. इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवण्याचं काम करते भारत जोडो यात्रा काढत भारत तोडते आहोत. भाजपामध्ये परिवर्तन झालं आत्ताचा भाजप बदललाय, भाजप हा सर्व जाती धर्मपंथांचा पक्ष आहे, संविधान बदलते ही अफवा आहे असं रामदास आठवले यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असा विश्वास देखील बोलून दाखवला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले डोंबिवलीत आयोजित राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेसाठी आले होते.

बच्चू कडू यांची समजूत काढू – रामदास आठवले
नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात शड्डू ठोकला आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी अनेक या आधीचे विषय मिटवले आहेत. विषय मिटवावा मी स्वतः बच्चू कडू यांच्याशी बोलणार आहे त्यांचे नाराजी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

वंचितचा निर्णयाचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून समर्थन
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी मधून जवळपास बाहेर पडल्याच निश्चित झालं आहे. याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचितचा हा योग्य निर्णय असल्याचे सांगितले. वंचितने काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरेदी यांना महाविकास आघाडीला पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे तो निर्णय स्वबळावर लढण्याचा घेण्यात आला आहे. तो योग्य निर्णय आहे दुसरा इलाज नाही. महाविकास आघाडी यांना विकास करता आला नाही. गेल्या दहा वर्षात बदल जाणवतोय देशावर नरेंद्र मोदी हाच एक मोठा पर्याय आहे असे सांगितले

आरपीआय महायुतीत आहे जागेची अडचण होती. शिर्डीसाठी माझा आग्रह होता मात्र शिर्डीची जागा सोडता आली नाही पण बाकीच्या जी काही आश्वासन दिले ते आश्वासन ते पाळतील असे आम्हाला आशा आहे. मनसे काय अद्याप महायुतीमध्ये आलेले नाही त्यामुळे त्यांना कुठली जागा सोडण्याचा निर्णय नाही.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर ताबा करण्यात आला होता. मात्र शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आठवले नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत बोलताना आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह होता. मात्र एकनाथ शिंदे यांची अडचण होती. देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांनी 2006 ला माझी राज्यसभा संपते ते कंटिन्यू करण्याचा आश्वासन दिले. त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्रीपद आहे आता कॅबिनेट मंत्री पदासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळ होणाऱ्या विस्तारात देखील आरपीआयला जागा दिली जाईल असे देखील आश्वासन दिल्याचं आठवले यांनी स्पष्ट केले.

महायुतीच्या कार्यक्रमांमध्ये आरपीआयचा झेंडा दिसत नाही याबद्दल थोडी नाराजी होती. मात्र येथून पुढे आरपीआयला सन्मान दिला जाईल असा आश्वासन फडणवीस यांनी दिलं. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कालखंडात बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक स्मारकांचे काम त्याचप्रमाणे इंदूमिल येथील स्मारकाचे काम देखील सुरू आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असा विश्वास यावेळी रामदास आठवले यांनी बोलून दाखवला तसेच संविधान कोणी बदलू शकत नाही. संविधानाला अजिबात हात लावू देणार नाही माझ्या पक्षाचे असल्याचे आठवले यांनी सांगितले. डोंबिवलीत राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीयमंत्री रामदास आठवले उपस्थित होते.

Web Title: Todays bjp has changed todays bjp is a party of all castes and religions union minister ramdas athawale maharashtra political party loksabha elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2024 | 11:39 AM

Topics:  

  • kalyan
  • kalyan news update
  • Loksabha Elections
  • thane

संबंधित बातम्या

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित
1

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार
2

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
3

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम
4

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.