टीबीमुक्त भारतासाठी ‘रील’चा फंडा; परिचारिका आणि विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधीटीबीमुक्त भारतासाठी ‘रील’चा फंडा; परिचारिका आणि विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी
परस्पर संमतीने अवघ्या 18 दिवसांत घटस्फोटाचा दावा मंजूर; 2020 मध्ये झालं होतं लग्न, पण नंतर…
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र शाखेच्या संयुक्त पुढाकाराने ही स्पर्धा होत आहे. परिचर्या विद्यालये, महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी तसेच सेवेत कार्यरत परिचारिका यात सहभागी होऊ शकतात. क्षयरोगाची लक्षणे, वेळेवर तपासणी, उपचार पूर्ण करण्याचे महत्त्व, उपचारात खंड न पाडणे, योग्य पोषण आणि टीबी रुग्णांबाबतचा सामाजिक कलंक दूर करणे, अशा विषयांवर रील तयार करता येणार आहेत. विशेष म्हणजे रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात असलेल्या परिचारिका आणि विद्यार्थ्यांकडून संदेश दिला जाणार असल्याने आरोग्यविषयक माहिती अधिक वास्तव आणि प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
मराठी भाषेतील रीलमध्ये स्थानिक बोली, संवाद, छोट्या नाटिका, ग्रामीण जीवनशैली आणि प्रत्यक्ष अनुभवांचा वापर करता येणार आहे. रील पाठविण्याची अंतिम मुदत १४ ऑगस्ट २०२६ असून, tnaimahabr@yahoo.co.in या ई-मेलवर रील पाठवावी. जास्तीत जास्त विद्यार्थी परिचारिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य सेवा (सुश्रुषा) उपसंचालक डॉ. निलिमा सोनावणे यांनी केले आहे.
टीबी म्हणजे काय?
टीबी (Tuberculosis) ज्याला मराठीत क्षयरोग असेही म्हटले जाते हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा प्रामुख्याने शरीरातील फुफ्फुसांवर परिणाम करतो पण शरीरातील इतर भाग जसे की मणका, मूत्रपिंडे किंवा मेंदू यांच्यावरही हा आजार पसरण्याचा धोका असतो. बऱ्याचदा टीबीची लक्षणे सुरुवातील शरीरात जाणवत नाहीत ज्यामुळे अनेक वर्षे लोकांना हे माहितीच नसते की त्यांना टीबी हा आजार झाला आहे. पूर्वी हा आजार फार गंभीर मानला जायचा पण आता त्यातून सुखरुप बाहेर पडता येऊ शकते. टीबीवर उपचार उपलब्ध आहेत पण वेळीच यावर उपाययोजना केल्यास आणि सुरुवातीलाच याची लक्षणे ओळखल्यास आजारावर सहज मात करता येऊ शकते.
टीबीचे लक्षणे?






