
विश्वास पाटील हे प्रसिद्ध कादंबरीकार अन् निवृत्त आयएएस अधिकारी
99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे भूषवले होते अध्यक्षपद
विश्वास पाटलांची आयोगासमोर उलटतपासणी
पुणे: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या आयोगासमोर कादंबरीकार व निवृत्त आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांची उलटतपासणी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “संभाजी” या कादंबरीत अंत्यसंस्काराच्या प्रसंगात गोविंद महार या व्यक्तीचा उल्लेख कोणत्या ऐतिहासिक पुराव्यावर केला आहे, असा सवाल विशेष सरकारी वकील (एस.पी.पी.) शिशिर हीरे यांनी केला.
यावर उत्तर देताना पाटील यांनी सांगितले की, कादंबरीतील संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित पात्रे काल्पनिक असून या घटनेबाबत ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. “कादंबरीतील काल्पनिक दुय्यम पात्रे सर्व जाती व समुदायांचे प्रतिनिधित्व करतात. वडू बुद्रुक येथे संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्कारावेळी विविध समाज एकत्र आले होते, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यातून केला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
वडू ग्रामपंचायतीचे वकील मंगेश देशमुख यांनी दाखल केलेल्या अर्जानंतर पाटील यांना चौकशीसाठी आयोगासमोर बोलावण्यात आले होते. गोविंद गोपाल महार यांनी अंत्यसंस्कार केल्याचा समज प्रस्थापित करण्यासाठी कादंबरीचा वापर करून समाजांमध्ये द्वेष पसरवला जात असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, “राजकीय किंवा सांप्रदायिक लाभासाठी साहित्याचा वापर करू नये.”
“सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा…”; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डुडी?
उलटतपासणीदरम्यान पाटील यांनी सांगितले की, काही घटनांचे चित्रण प्रभावी करण्यासाठी कादंबरीत काल्पनिक पात्रांचा समावेश केला आहे. तसेच १७व्या शतकाच्या सुरुवातीच्या सनदांमधून गोविंद महार या नावाचा संदर्भ घेतल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, वकील देशमुख यांनी सनदांमध्ये अशा व्यक्तीचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, वडू बुद्रुक हे ऐतिहासिक गाव असून येथे ‘बापूजी आणि पद्मावती शिवले’ यांचे स्मारक आहे. स्थानिक मराठा समाजाच्या मते, १६८९ मध्ये मुघल बादशहा औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर, त्याचे आदेश झुगारून शिवले देशमुख यांनी त्यांच्या अंत्यसंस्कार केले होते. निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय आयोग सध्या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या कारणांचा तपास करत आहे.
काय म्हणाले संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील?
“सध्या काळ वेगळा आहे. निवणुकांचा काळ आहे. देवेंद्रजी तुमची निवडणुकीची आचारसंहिता असेल तर आमची विचारसंहिता आहे. शेतकरी आत्महत्या केवळ शासनाचे नव्हे तर साहित्यिकांचे देखील अपयश आहे. शेतकऱ्याना न्याय मिळाला पाहिजे. अण्णाभाऊ साठे याना भारतरत्न मिळाला पाहिजे.”