Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला जे काही बोलायचंय, जे काही वाभाडे काढायचेत ते 22 तारखेला…’; राज ठाकरेंचं सूचक विधान

सध्या महाराष्ट्रात जे काही सुरु आहे ते खड्ड्यात नेणारे आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात पाहिलं नाही ते आज होतंय. गलिच्छ राजकारण केले जात आहे. टीव्हीवर पाहवत नाहीत. आपली लोकं किती खालच्या थराला गेली आहे. किती बोलायचं हे ऐकूही वाटत नाही, असे त्यांनी म्हटले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 09, 2023 | 09:30 PM
‘मला जे काही बोलायचंय, जे काही वाभाडे काढायचेत ते 22 तारखेला…’; राज ठाकरेंचं सूचक विधान
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन (MNS Foundation Day) आज साजरा झाला. मनसेचा हा वर्धापनदिन पहिल्यांदाच ठाण्यात (Thane Rally) झाला. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीरसभा झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी ‘बरेच विषय आहेत सगळ्या तारखा एकदम आल्या. 22 तारखेला आपली गुढीपाडव्याची सभा आहे. त्यासाठी शिवतीर्थावर यावं. मला जे काही बोलायचंय, जे काही वाभाडे काढायचेत, जे कोणाला फाडायचे ते 22 तारखेला पूर्ण बुफे मिळेल’, असे सूचक विधान केले.

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मनसेचा मेळावा साजरा झाला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुका अजून जाहीर होत नाहीत. दोन वर्षे तेच सुरु आहे. दहावीला नापास झाल्यासारखं वाटतंय. सारखं मार्च-ऑक्टोबर-मार्च हेच सुरु आहे. निवडणुका होऊ देच. तमाम जनता यांना विटलेली आहे. आता त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे. मी भाषण देईन पण घराघरांपर्यंत तुम्हाला जायचंय, असे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून भाष्य केले. तसेच निवडणुका कधीही होऊ दे, आपण महानगरपालिकेत सत्तेत असणार म्हणजे असणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

…ते सर्व महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारं

सध्या महाराष्ट्रात जे काही सुरु आहे ते खड्ड्यात नेणारे आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात पाहिलं नाही ते आज होतंय. गलिच्छ राजकारण केले जात आहे. टीव्हीवर पाहवत नाहीत. आपली लोकं किती खालच्या थराला गेली आहे. किती बोलायचं हे ऐकूही वाटत नाही, असे त्यांनी म्हटले.

राजकारणाचा चिखल झालाय

राजकारणाचा चिखल झाला आहे, त्यावर मी गुढीपाडवा मेळाव्यात बोलणार असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. त्यावेळी ट्रेलर, टीझर नाही तर पूर्ण सिनेमाच दाखवणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

Web Title: Whatever i want to say whatever i want to talk about on the 22 march says raj thackeray nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2023 | 09:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • MNS Chief
  • MNS Vardhapan Din
  • political news
  • raj thackeray
  • Thane Rally

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.