Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: शेतात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ! शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; वनविभागाकडे पंचनाम्यासह भरपाईची मागणी

अंजनगाव सुर्जी तालुक्यात सध्या वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. रानडुकरे, हरणे, काळवीट आणि नीलगायींच्या कळपांकडून तूर, सोयाबीन, कापूस तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2026 | 02:30 PM
शेतात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ! शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; वनविभागाकडे पंचनाम्यासह भरपाईची मागणी

शेतात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ! शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; वनविभागाकडे पंचनाम्यासह भरपाईची मागणी

Follow Us
Follow Us:

अनियमित पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे दुहेरी संकट ओढवले आहे. तालुक्यातील गावंडगाव येथील शेतकरी प्रशांत सदाशिव देशमुख व सुषमा प्रशांत देशमुख यांच्या सहा एकरांतील तुरीचे पीक रानडुकरे आणि हरणांच्या कळपाने अक्षरशः उद्ध्वस्त केले. दुबार पेरणी करूनही पीक वाचवता न आल्याने त्यांचा संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला असून, वनविभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. देशमुख दाम्पत्याने मोठ्या आशेने सहा एकर क्षेत्रात तुरीची पेरणी केली होती. मात्र, अनियमित पावसामुळे पीक उगवण्यास विलंब झाला. त्यातच रानडुकरांनी शेतात घुसून जमिनीत पेरलेले बियाणे उकरून फस्त केले. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतरही त्यांनी अतिरिक्त खर्च करून दुबार पेरणी केली.(फोटो सौजन्य – istock)

८.६८ लाख पशुधनाला लसीकरणाचे कवच! पशुसंवर्धन विभागाची मोहीम; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकार आजारावर उपचार

काही दिवसांनी तुरीची रोपे जोमाने उगवू लागली. मात्र, त्याचवेळी हरणांच्या कळपाने शेतात धुमाकूळ घालत संपूर्ण पीक कुरतडून टाकले. हाती येण्याच्या मार्गावर असलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट झाल्याने देशमुख कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता शेतकऱ्यांना दिवस-रात्र शेतात मुक्काम करून पिकांची राखण करावी लागत आहे. तरीही रानडुकरे, हरणे, काळवीट आणि नीलगायींच्या कळपापुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे या प्राण्यांना कोणतीही इजा करता येत नसल्याने नुकसान मुकाट्याने सहन करावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

तूर पिकावर वन्यप्राण्यांचा हल्ला:

अंजनगाव सुर्जी तालुक्यात सध्या वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. रानडुकरे, हरणे, काळवीट आणि नीलगायींच्या कळपांकडून तूर, सोयाबीन, कापूस तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे पिकांचे संरक्षण करणे कठीण बनले असून, शेतकऱ्यांना रात्रभर शेतात मुक्काम करून राखण करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने पेरणी आणि दुबार पेरणी केली असतानाही वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत.

Yavatmal News: अन्न व औषध प्रशासनाची कारवाई शून्य? आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; मिठाई साठवणुकीची जुनीच पद्धत

दुबार पेरणीही वाया:

अनियमित पावसामुळे पहिली पेरणी अयशस्वी
रानडुक्करांनी बियाणे उकरून फस्त केले
अतिरिक्त खर्च करून दुबार पेरणी
उगवलेले पीक हरणांच्या कळपाने कुरतडले
सहा एकरांतील तुरीचे मोठे नुकसान

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Wild animals ravage farmlands leaving farmers in double trouble demand compensation and spot inspection from forest department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Amaravati
  • amaravati news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक
1

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक

प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्…; लातुरातील घटना
2

प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्…; लातुरातील घटना

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात
3

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात

Sindhudurg News: कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मगदूम यांना ५० हजारांचा दंड; बाबल पावस्कर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात जाणार
4

Sindhudurg News: कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मगदूम यांना ५० हजारांचा दंड; बाबल पावस्कर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.