यवतमाळ गणेशोत्सव 2026 (फोटो- ai gemini)
याशिवाय ५४४ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा भावपूर्ण घोषणा देत, गणरायांच्या मूर्तीसमोर नृत्य करीत मंडळांनी बाप्पांचे स्वागत केले. यंदा महागाईचा परिणाम गणेशमूर्तीच्या किमतींवर तसेच सजावटीच्या साहित्यावरही झालेला आहे. पण गणेश भक्तांनी तेवढ्याच उत्साहाने गणरायाचे स्वागत केले.
Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!
लाडक्या गणरायाची स्वागताची जय्यत तयारी सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी केली होती. ठिकठिकाणी रोषणाईसह वेगवेगळ्या प्रकारचे देखावेसुद्धा तयार केले. घरगुती गणेशाची स्थापना करणाऱ्यांनीसुद्धा सामाजिक संदेश देणारे देखावे केले. बाप्पांच्या आगमनासाठी अबालवृद्धांपासून ते बच्चे कंपनीत उत्साह दिसत होता. गणरायाला घरी नेण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांनी सकाळपासूनच बाहेर पडण्यास सुरूवात केली. शहरातील समता मैदान येथे मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटले होती.
पालकमंत्र्यांकडेही झाले बाप्पा विराजमान
वातावरणीय बदलामुळे राज्यातील शेतकऱ्यासह जनतेसमोर निर्माण झालेले दुष्काळाचे विघ्न दूर करून्, भरपूर पाऊस पडून दे आणि राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुख, समृद्धी भरभराट येवू दे, अशी प्रार्थना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी श्री गणेश चतुर्थीनिमित्त यवतमाळ येथे निवासस्थानी गणेश स्थापनेवेळी केली.
Ratnagiri News: गावाकडच्या वाटा गजबजल्या! मुंबई-पुण्याहून लाखो भाविक कोकणात दाखल;
यावेळी संजय राठोड यांच्या सहचारिणी शितल, मुलगी अॅड. दामिनी, मुलगा सौहम यांच्यासह कुटुंबीय, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित डोते. याप्रसंगी माध्यमाशी बोलताना संजय राठोड म्हणाले, राज्यात यावर्षी अल निनोमुळे दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर बिकट संकट ओढवले आहे. पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात घट होण्याची भीती असून, पाण्याचेही दुर्भिक्ष्य आणवणार आहे. त्यामुळे हे संकट दूर करण्यासाठी बाप्पाकडे साकडे घातले.






