प्रलंबित ई-केवायसीमध्ये पाच वर्षांखालील बालकांचा वाटा किती आणि प्रत्यक्षात बोगस अथवा अपात्र लाभार्थी किती, याची पडताळणी पुरवठा विभागाकडून सुरू आहे. तालुकानिहाय कामगिरीचा विचार केला असता कळंब तालुक्याने ८७.४० टक्के ई-केवायसी पूर्ण करून आघाडी घेतली आहे.
अनेक मार्गावर खड्डे, उखडलेले डांबर आणि अर्धवट कामे दिसत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात या खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालक, नागरिक आणि शाळकरी मुलांसाठी धोका निर्माण झाला आहे.
मागील काही दिवसांमध्ये अमरावती शहरात सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यावर घरातील नळांमध्ये गढूळ आणि पिवळ्या रंगाच्या पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मुसळधार पावसामुळे यवतमाळमध्ये तब्बल ९८ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. एका दिवसांमध्ये तब्बल १३५ मिमी विक्रमी पावसाची नोंद होवून नदी, नाल्याना मोठा पूर आला आहे. तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
राज्य शासन ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र अत्यल्प निधीअभावी आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षणच रखडल्याचे वास्तव समोर आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांची कमतरता ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील प्रमुख समस्या ठरत आहे. अनेक ठिकाणी एकाच डॉक्टरावर दोन ते तीन केंद्रांची जबाबदारी असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.
नुकसान झाल्यानंतर कागदपत्रांतील त्रुटी किंवा अटींचा आधार घेत विमा दावे नामंजूर होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे पीकविमा नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, स्पष्टीकरण अनिवार्य करावे.
दरवर्षी पावसाळ्यात दूध उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे काही प्रमाणात दुधाची टंचाई जाणवते. सध्या एफडीएकडून धाडसत्र सुरू असल्याने भेसळखोरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परिणामी दूध उत्पादनात पाच ते सात टक्क्यांची घट झाली आहे.
Maharashtra Farmer Suicide News: राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत जाहीर झालेल्या यादीत नाव नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
उन्हाळा व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात गाय, बैल, शेळ्या यासह इतर पशुधनाला संसर्गजन्य आजारांचा धोका आहे. त्यामध्ये मोठ्या जनावरांना घटसर्प व फऱ्या, तर लहान जनावरांना आंत्रविकाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
किटाळी गाव परिसरातील १८० हेक्टर क्षेत्रात विविध धातूंच्या उपलब्धतेचे मूल्यांकन करण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला करार देण्यात आला आहे. ही कंपनी सर्वेक्षण करून राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.
यवतमाळ शहरातील उडपी हॉटलवरती कारवाई करून लायन्सन रद्द करण्यात आले आहे. तरी आता आम्ही स्वतः जिल्ह्यात गोपनीय माहिती घेऊन व नागरिकांच्या तक्रारी असल्यास आमची टीम कारवाईसाठी सज्ज आहे.
अवैध कृषी निविष्ठांच्या पुरवठा साखळीवर मोठा आघात झाला असून अशा व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्यापक आणि धडक मोहिमेमुळे अमरावती विभागाने बनावट कृषी निविष्ठांविरोधातील कारवाईत राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे.