
Maharashtra Politics: राज्यात नाट्यमय हालचाली? 'या' नेत्याने केली गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी
उमदी एमआयडीसीसाठी जागा व निधीची व्यवस्था नाही, तसेच तीन वेळा जाहिरात देऊनही एकही उद्योग आला नसल्याचा दावा पाटील यांनी केला. जत तालुक्यातील आठ गावे व ६६ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जनावरांसाठी चारा उपलब्ध नसताना विविध मोठ्या घोषणा केल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
बांबू लागवड, जल जीवन मिशन, एमआयडीसी आणि जतला ‘देवभूमी’ करण्याच्या घोषणांमुळे रस्ते, पाणी, आरोग्य व शेतीच्या प्रश्नांमध्ये नेमका काय बदल होणार, हे पडळकर यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी पाटील यांनी केली. केवळ अपयश झाकण्यासाठी घोषणा करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
म्हैसाळ योजनेच्या पाण्याबाबतही पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत जतच्या जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे सांगितले. इतरांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याऐवजी जाहीरनाम्यातील कामे पूर्ण करून त्यांचे उद्घाटन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विकसित होत असलेल्या जतच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
आम्ही केलेल्या कामाचे उदघाटन, मुखमंत्र्यांकडे तक्रार
निधीच्या कामाच्या उद्घाटनावरूनही आरोप
माडग्याळ येथे जिल्हा परिषद निधीतून झालेल्या कामाचे आमदार पडळकर यांनी घाईघाईने उद्घाटन केल्याचा आरोप तामनगौडा पाटील यांनी केला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सावित्री रवी पाटील यांना किंवा जिल्हा परिषदेच्या कोणत्याही प्रमुख पदाधिकारी तसेच अधिकारी यांना देखील निमंत्रण देण्यात आले नव्हते , याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. २२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.