
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अरिजीत सिंग यांनी पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केल्यापासून, चित्रपटसृष्टीत गायकांच्या मानधनाबद्दल एक नवीन वाद सुरू झाला आहे. आता, देशातील पहिले “इंडियन आयडल” अभिजीत सावंत यांनीही चिंता व्यक्त केली आहे आणि काही धक्कादायक खुलासे केले आहेत. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिजीत यांनी सांगितले की, इंडस्ट्रीतील गायकांवर अनेकदा मोफत गाण्यासाठी दबाव आणला जातो. गायकाने एखाद्यावर विश्वास असणे किती महत्वाचे आहे याबद्दल देखील सांगितले आहे, ज्याबद्दल अनेक गायकांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली आहे. अभिजीत यांनी असेही म्हटले की गायक उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे पैसेही कमवत नाहीत.
इंडियन आयडल सीझन १ चा पहिला विजेता अभिजीत सावंतने पेंटराइज स्टुडिओशी संवाद साधला. गायकाला चित्रपटांमध्ये गाण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल विचारले असता, त्याने कोणताही संकोच न करताना सांगितले, “लोकांना गायकाचे चित्रपटापेक्षा मोठे नाव व्हावे असे वाटत नाही, म्हणून त्यांना एक निश्चित रक्कम दिली जाते. संगीतकारांना अजूनही चित्रपटांमध्ये त्यांच्या संगीतासाठी रॉयल्टी मिळत नाही.” असे तो म्हणाला आहे.
अभिजीत सावंत पुढे म्हणाला, ” ‘लफझों में कह ना सकून’ या गाण्यावर काम करणाऱ्या बिड्डूप्रमाणेच त्यानेही पाश्चिमात्य देशांमध्ये काही गाणी गायली आहेत आणि त्या दोन गाण्यांमधून त्याला जगण्यासाठी पुरेशी रॉयल्टी मिळावी आहे. गायकाला कधी त्यांच्या उदरनिर्वाह करण्यासाठीही पुरेसे पैसे मिळत नाहीत.”
चित्रपटांपेक्षा स्टेज शोमधून जास्त कमाई मिळते असे अभिजीत सावंतचे म्हणणे आहे. याबद्दल बोलताना गायक पुढे म्हणाला, “इंडस्ट्रीने ही व्यवस्था निर्माण केली आहे. गायक स्वतः संधींसाठी लोभी असतात आणि त्यांना माहित आहे की जर त्यांच्या आवाजात एखादे गाणे रिलीज झाले आणि एखादा मोठा स्टार त्याच्या ओठांवर मॅच झाला ते आयुष्यभर गाणं वाजणार आहे. कधीकधी, गायकाला स्वतःहूनच पैसे नको असतात कारण त्यांना फक्त गाणे किंवा एखाद्या विशिष्ट निर्मात्यासोबत काम करायची इच्छा असते. यासाठी आम्हाला जे काही पैसे मिळतात ते आम्ही स्वीकारतो, कारण जर आम्ही तसे केले नाही तर दुसरे कोणीतरी ते गाणे करेल.” असे अभिजीत बोलताना दिसला आहे.
Dhurandhar: The Revenge ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुस्साट! चित्रपटाने रिलीजआधीच स्वतःचाच मोडला रेकॉर्ड
अरिजीत सिंगने अचानक निवृत्तीचा घेतला निर्णय
गायकांच्या मानधनावरील वादाला अलीकडेच वेग आला जेव्हा २७ जानेवारी रोजी अरिजीत सिंगने अचानक सोशल मीडियावर पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने लिहिले, “नमस्कार, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या काही वर्षांपासून चाहत्यांनी मला इतके प्रेम दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. मी आता पार्श्वगायक म्हणून कोणतीही नवीन जबाबदारी स्वीकारणार नाही. मी ती संपवत आहे. हा एक अद्भुत प्रवास होता.” असे लिहून अरिजीतने अनेक चाहत्यांना नाराज केले.