
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
या अभिनेत्याला ‘रहमान डकैत’ भूमिका ऑफर?
‘धुरंधर’ चित्रपटाने अभिनेता अक्षय खन्ना यांना हवे असलेले यश मिळवून दिले. लोकांनी त्याच्या प्रतिभेला ओळखले आणि तो आता हा अभिनेता इंडस्ट्रीचा मोठा स्टार बनला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अचानक एक अफवा पसरत आहे की अक्षय खन्नापूर्वी, रेहमान डाकूची भूमिका साऊथमधील सुपरस्टार नागार्जुनला यांना ऑफर करण्यात आली होती, परंतु त्यांनी या चित्रपटाला नकार दिला. आता, या दाव्यामागील खरे सत्य उघड झाले आहे.
‘बॉलीवूडमधील सगळ्यात वाईट नट, त्याला धड…,’ प्रशांत नारायणन यांनी ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यावर केली टीका
‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना नागार्जुनने यांनी खुलासा केला की त्याला “धुरंधर” हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. त्याने आदित्य धरचा चित्रपट कसा आवडला हे देखील सांगितले. अभिनेता म्हणाला, “अजिबात नाही. मला ती भूमिका ऑफर करण्यात आली नव्हती. परंतु, मला ती मिळाली असती तर बरे झाले असते. धुरंधर हा एक अद्भुत चित्रपट आहे. आदित्य धरने तो उत्तम प्रकारे दिग्दर्शित केला आहे. मला त्याचा मागील चित्रपट ‘उरी’ देखील खूप आवडला. सर्वांचा अभिनय उत्कृष्ट आहे आणि अक्षय खन्नाने खळबळ करून टाकली. मी या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याला आणखी एक सुपरहिट चित्रपट मिळावा अशी मी प्रार्थना करतो.”
‘धुरंधर’ चित्रपटाने कोणते बदल घडवून आणले?
नागार्जुनने ‘धुरंधर’ चित्रपटानंतर झालेल्या बदलांचा उल्लेख केला. त्यांच्या १०० व्या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल, अभिनेत्याने सांगितले की, “आम्ही कोणत्याही गोष्टीची घाई करत नाही आहोत. चित्रपट लवकर पूर्ण करण्याची गरज नाही. आम्हाला हा चित्रपट खूप खास हवा आहे. ‘धुरंधर’ चित्रपटानंतर, हे स्पष्ट आहे की प्रेक्षक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कथा आणि शैलीची मागणी करत आहेत.” असे अभिनेता म्हणाला आहे.
तमन्ना भाटियासोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा प्रेमात पडला Vijay Verma? व्हॅलेंटाइन डे पोस्टने वेधले लक्ष
‘धुरंधर’ चित्रपटाने बॉलीवूडला प्रचंड यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता, चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, ‘धुरंधर – द रिव्हेंज’ देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. असेही म्हटले जात आहे की अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. दुसऱ्या भागाचा प्रेक्षकांवर पहिल्यासारखाच प्रभाव पडेल का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.