
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सलमान खानच्या एका चाहत्याने नुकतीच “दबंग” चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिनव गेल्या काही काळापासून सलमान खानविरुद्ध वारंवार वक्तव्य करत होता, अनेक आक्षेपार्ह टिप्पण्या देखील अभिनेत्यावर करताना दिसला. त्याने त्याच्यावर अनेक गंभीर आरोपही केले होते. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिनव कश्यपने पुन्हा सलमानवर टीका केली, ज्यामुळे अभिनेत्याचा एक चाहता संतापला आणि त्याने पोलिसांकडे धाव घेतली. आणि दिग्दर्शकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
इमरान काझी नावाच्या एका चाहत्याने त्याच्या मित्रांसह वांद्रे पोलिस ठाण्यात अभिनव कश्यपविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी याचिका सादर केली आहे. पापाराझीने या घटनेबद्दल इमरान काझीशी बोलून व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. आता हा चाहता या व्हिडीओमध्ये नक्की काय म्हणाला आहे जाणून घेऊयात.
सलमानचा चाहता म्हणाला की अभिनव कश्यप वाईट म्हणाला
व्हिडिओमध्ये इमरान काझी म्हणाला की, “मी सलमानचा चाहता आहे. मी आज वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये आलो आहे. अभिनव कश्यप नावाचा हा माणूस पॉडकास्टवर जाऊन सलमानबद्दल वाईट बोलतो. तो सलमान खानविरुद्ध वाईट भाषा वापरतो. तो सलमानबद्दल खूप खालच्या पातळीवर बोलतो. म्हणूनच आम्ही आज वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी याचिका दाखल करण्यासाठी आलो आहोत. सलमानची प्रतिष्ठा जगभरात बॉलीवूडमध्ये त्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीपेक्षाही जास्त आहे. सलमान त्याच्या उत्पन्नाच्या ७५% दान करतो. त्याची संस्था, बीइंग ह्यूमन, धर्मादाय, आरोग्य आणि शिक्षणासाठी काम करते. म्हणून, अशा व्यक्तीचे नाव कलंकित करणे योग्य नाही.” असे चाहता म्हणताना दिसला आहे.
“देव आपल्या सलमान भाईंना सुरक्षित ठेवो’ – इमरान
इमरान पुढे म्हणाला, “सरांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नजीकच्या भविष्यात, आम्ही गृहमंत्र्यांना त्यांच्याविरुद्ध जलद कारवाई करण्याचे आवाहन करू. आम्ही आमचे प्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या माणसाविरुद्ध जलद कारवाई करण्याची विनंती करू. देव आपल्या सलमान भाईंना सुरक्षित ठेवो. आम्ही चाहते वाईट लोकांची काळजी घेऊ.”
‘धुरंधर २’ पुन्हा अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत करणार जादू? चाहत्यांना मिळाली मोठी हिंट
अभिनव कश्यपने सलमानबद्दल सांगितल्या या गोष्टी
गेल्या काही महिन्यांत अभिनव कश्यप विविध पॉडकास्टवर दिसला आहे आणि त्याने सलमानविरुद्ध आवाज उठवला आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्याने सलमानला “ठग आणि वाईट वागणारा माणूस” म्हटले आहे, तो एक घाणेरडा माणूस आहे. अभिनवने सलमानने त्याचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केला. “दबंग २” का सोडला असे विचारले असता अभिनव म्हणाला, “मी कोणालाही तोडले नाही. हे लोक वाईट वागणारे आहेत, ते गुंड आहेत. त्यांना काम करायचे नाही, त्यांना उपकार करायचे आहेत.” असे दिग्दर्शक म्हणाला होता.