
फोटो सौजन्य - Social Media
Bhor Nasrapur : पुण्यात भोर तालुक्यात घडलेला क्रूर प्रकार सध्या चर्चेत आहे. एका 65 वर्षीय माणसाने 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला मारून टाकले. लेक खूप वेळ झाला घरी नाही आल्याचे कळताच घरच्यांनी जवळील पोलीस स्थानकाकडे धाव घेतली. तपासात लक्षात आले की एका 65 वर्षीय भीमराव कांबळे नावाच्या माणसाने 3 वर्षांच्या या चिमुरडीला घरापासून दूर नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा खून केला. दरम्यान, घरापासून 700 मीटर अंतरावर चिमुरडी मृतावस्थेत सापडली. या प्रकरणानंतर राज्यभरातून विविध क्षेत्रातील पुढाऱ्यांनी त्यांची मते नोंदवली आहेत आणि या घटनेचा निषेध केला आहे. पुण्यामध्ये सदर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लोकं रस्त्यावर उतरली आहेत.
दरम्यान, मराठी सिनेक्षेत्रातून या क्रूर घटनेसंबंधित अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखने या मुद्द्यावर टिप्पणी केली आहे. तो म्हणतो की, “जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात, ते फार शॉकिंग असतं. लोकांचा राग हा नैसर्गिक आहे. अशी अपेक्षा आहे की सरकार या मुद्द्यावर नक्कीच मोठी कारवाई करेल. सरकारने ही केस fast-track कोर्टाकडे सोपवली पाहिजे.” रितेश पुढे म्हणतो की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा क्रूरतेला संपवण्यासाठी अनेक न्याय कायदे होते. माझ्या मते, या क्रूर घटनेवर कोर्ट जितक्या लवकर सुनावणी करेल आणि पीडित कुटुंबाला न्याय देईल, तितके बरे आहे.”
मूळचा पुण्याचा असलेला दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण तरडेने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीण तरडेने पोस्ट करत लिहले आहे की, “उद्या त्या नराधमाच्या एन्काउंटर झाले तरच मानू हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहे… अन्यथा भोर-वेल्हा-मुळशीच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा…” . मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या प्रकरणावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर Kokanheartedgirl या नावाने सुप्रसिद्ध असलेली Social Media Influencer अंकिता वालावलकरने ही तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. Ankita Valavalkar ने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणते की, “महाराष्ट्रात या घटना या आधीही घडल्या आहेत. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळात जेव्हा या गोष्टी घडायच्या तेव्हा त्या गुन्हेगाराचे हात छाटले जायचे. कारण ती वृत्तीच छाटणे गरजेचं आहे.” अंकिता शासनाला आणि विरोधी पक्षाला विनंती करत म्हणते की, “या गुन्हयांविरोधात आपल्या न्यायव्यवस्थेत नक्कीच कायदा आहे. पण त्याला तितक्याच पळवाटाही आहेत. अशा गुन्ह्यांसाठी एक ठोस कायदा असणे काळाची गरज आहे.”