(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ ही लोकप्रिय मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेमधील जयंतची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधव या मालिकेने त्याला कसे बदलले याबद्दल सांगितले आहे. अभिनेता मेघन जाधवने २०२५ या सरत्या वर्षातल्या त्याच्या खास आठवणी आणि अनुभव शेअर केले.अभिनेता म्हणाला, ‘२०२५ वर्षाची माझी सुरुवात “लक्ष्मी निवास” मालिकेपासून झाली. वर्षाच्या दुसऱ्या दिवशी २ जानेवारीला मी शूट सुरु केल आणि ४ जानेवारीला माझी मालिकेत एन्ट्री झाली होती. ‘
‘खरं सांगायचं तर, या वर्षाबद्दल माझ्या मनात एक रिकामी चेकसारखी भावना होती, कारण मागील दोन वर्षे कामाच्या दृष्टीकोनातून फारशी चांगली नव्हती. पण फक्त दोन महिन्यांत, माझी आणि माझ्या सहकलाकार दिव्याची जोडी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय जोडी ठरली आणि आम्ही प्रत्येक माध्यमामध्ये झळकत होतो. मी नेहमी स्वतःला म्हणायचो, “एक संधी द्या, मी माझी किंमत सिद्ध करीन”, आणि देवाच्या कृपेने मला ती संधी मिळाली. मला जे काही जमत ते दाखवता आलं याचा खूप आनंद आहे.’
अभिनेता पुढे म्हणाला, ‘या वर्षभरात देव खूपच कृपाळू राहिला काही पुरस्कार मिळाले आणि शेवटी माझ्या आयुष्याच्या प्रेमाशी लग्न झाले. त्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी एका रोलरकोस्टरसारखं सुंदर राहिलं आहे. या वर्षाने मला एक अशी गोष्ट शिकवली, ज्याकडे मी याआधी कधीच लक्ष दिलं नव्हतं ती म्हणजे कृतज्ञता. माझी सहकलाकार दिव्या हिला विचाराल तर तीही हिच गोष्ट सांगेल, कारण रोजच्या रोज आम्ही एकत्र देवाचे आभार मानणे हा आमचा सकाळचा नियम आहे. काम, प्रसिद्धी आणि त्यासोबत येणाऱ्या अनेक गोष्टींपलीकडे जाऊन, या वर्षाने मला सर्वात मोठा धडा दिला जीवनातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहण. आतापर्यंत मी फक्त कामाकडेच लक्ष देत होतो, पण या वर्षाने मला व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल कसा साधायचा हे शिकवलं. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत हे समजलं.’ असे अभिनेता म्हणाला.
‘लक्ष्मी निवास’ या मालिकेने अभिनेत्याच्या आयुष्यत असंख्य सुंदर आठवणीं दिसल्या आहेत. अभिनेत्याला या मालिकेसाठी लोकप्रिय जोडी, सर्वोत्कृष्ट पुरुष पात्र असे अनेक पुरस्कार मिळाला आहे. आणि यासाठी त्याने सगळेच मनापासून आभार देखील मानले आहे. तसेच सध्या मालिकेची कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत सध्या सिद्धू, भावना, जान्हवी, विश्वा आणि जयंत यांच्यातील नाट्यमय संघर्ष उंचावलं आहे. ही मालिका प्रेक्षकांना दररोज नवनवीन ट्विस्ट्स आणि भावनिक वळणांसह प्रेक्षकांना गुंतवून ठेवत आहे.






