
समरची एक्स गर्लफ्रेन्ड किमया जेव्हा स्वानंदीला भेटते तेव्हा ती स्वानंदी टोमणे मारते. तुझ्याशी लग्न केल्याने समर दुखी राहणार असा टोला किमया स्वानंदीवा देते. या स्वानंगी देखील किमयाला चांगलीच चपराक देते. म्हणते की, आमचं नातं कोणालाही हेवा वाटेल असंच आहे. किमया आल्यापासून समरचं सर्व लक्ष तिच्याकडे आहे. किमया समरशी हक्काने वागते हे कुठेतरी स्वानंदीला खटकत असतं. तिला किमयाच्या वागण्याचा राग येत असतो पण स्वानंदी हे मान्य करायला तयार नसते. पण एक वेळ अशी येते की, तिला तीचं सांगतं की, समर आवडायला लागलाय. मालिकेचा याबाबत प्रोमो समोर आला आहे.
प्रोमोनुसार, किमया समरच्या खोलीत त्याच्याशी गप्पा मारत असते. त्यावेळी किमया चिडून समरच्या हातातल्या फाईल्स घेते. किमया समरला म्हणते की, मी तुझ्याशी गप्पा मारते जुन्या आठवणींबद्दल बोलतेय आणि तू काम काय करत बसलाय. किमया समरच्या फाईल्स हिसकावते आणि नेमकी त्यावेळी स्वानंदी खोलीत येते. तेव्हा स्वानंदीला समर आणि किमयाचं एकत्र येणं खटकायला लागतं. स्वानंदीला कळत नाही की नक्की तिला वाईट कशाचं वाटतंय. तेवढ्यात आरशातून एक आवाज येतो. तो आवाज म्हणजे स्वानंदीचं मन. ते तिला विचारतं, वाईट वाटतंय का खूप ? त्यावेळी स्वानंदी म्हणते की, काय उपयोग आहे याला नातं तर तडजोडीवर आहे ना ? तेवढ्यात स्वानंदीचं मन म्हणतं की, मन तर पडलंय ना समरच्या प्रेमात. स्वानंदी गोंधळून जाते, असा हा प्रोमो सध्या झी मराठीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.किमाायचं येणं हे समर स्वानंदीच्या नात्यात आणखीन जवळीक वाढवेल की नात्यात दुरावा येईल. स्वानंदी समरवर असलेलं प्रेम मान्य करेन की स्वत:ची समजूत काढून समपासून लांब राहील हे पाहणं आता विशेष ठरणार आहे.
Detective Dhananjay सिरीज का पहावी, 5 कारणं; तुमचा विकेंड करेल स्पेशल