भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. भारताच्या संघाने सलग दोन सामने जिंकून सेमीफायनलचा मार्ग मोकळा केला आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता तर दुसऱ्या सामन्यामध्ये युएईचा पराभव केला आहे. युएईच्या विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने ७८ धावांनी सामना जिंकला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघीनी सामन्यामध्ये दमदार कामगिरी करत युएई समोर २०२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. हे लक्ष्य युएईच्या संघाला पूर्ण करता आले नाही.
भारताच्या संघाचा पुढील सामना नेपाळविरुद्ध असणार आहे. फोटो सौजन्य - indiancricketteam इंस्टाग्राम
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघींची जोडी हिट ठरली या सामन्यामध्ये यूएईच्या गोलंदाजांना या दोघीनी चागंलेच धुतले.
भारताच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झालं तर दीप्ती शर्माने ४ षटकांमध्ये २३ धावा देत, २ बळी घेतले.
टीम इंडिया कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघीनी त्यांचे या स्पर्धेतील अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर रिचा सामन्यामध्ये वेगाने धावा केल्या.
भारताची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने १८ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या आहेत. परंतु स्मृती मानधना सामन्यामध्ये फार चांगली कामगिरी करू शकली नाही
पूजा वस्त्रकार आणि तनुजा कनवर या गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला होता.