
६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया (Photo Credit- X)
पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत! कितीही कारणे द्या… सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे.
आज आपला ६० वा वर्धापन दिन! पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत! कितीही कारणे द्या…
सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे… — Aaditya Thackeray (@AUThackeray) June 19, 2026
स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे. महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही! ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल! असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी कुठलीही संधी न सोडता आदित्य ठाकरेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले की, ज्याप्रमाणे अभिषेक बॅनर्जींमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला आणि फूट पडली, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीला आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. राणे यांनी म्हटले की, आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे गटाचे “अभिषेक बॅनर्जी” आहेत. त्यांनी टोमणा मारत पुढे सांगितले की, ज्याप्रमाणे अभिषेक बॅनर्जींना हेल्मेट घालून फिरावे लागते, तशीच भेट म्हणून ते आदित्य ठाकरेंनाही हेल्मेट पाठवत आहेत कारण कधी आणि कुठून चप्पल किंवा अंडे उडत येईल, याचा काही नेम नाही.
नितेश राणे यांनी दावा केला की, उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी केलेल्या बंडाचे मुख्य कारण म्हणजे पक्ष नेतृत्वाचा काँग्रेसशी वाढलेला जवळीक. त्यांच्या मते, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला काँग्रेसशी युती करायची होती आणि ते पक्षाच्या विलीनीकरणाच्या दिशेनेही वाटचाल करत होते ही गोष्ट अनेक खासदारांना मान्य नव्हती.