
Arvind Kejriwal Slams BJP, Arvind Kejriwal on BJP, Neet Paper leak Case,
अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी NEET पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर चांगलीच आगपाखड केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “२०१४ पासून आतापर्यंत ९३ पेपर लीक झाले आहेत. यामुळे ६ कोटींपेक्षा जास्त युवकांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. अश्यातच सर्वाधिक पेपर लीक त्या राज्यांमध्ये झाले, जिथे भाजपची डबल इंजिन सरकार आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात मध्ये सर्वाधिक पेपर लीक झाले आहे. हा फक्त योगायोग आहे का?” असा सवाल त्यांनीं उपस्थित केला.
NEET UG 2026 : थलपथी विजय यांची ‘नीट’ रद्द करण्याची मागणी; मग आता परीक्षा होणार की नाही ?
नेपाळ आणि बांग्लादेशमधील Gen-Z आंदोलनाच्या पार्शवभूमीवर ते पुढे म्हणाले, “जर नेपाळ आणि बांग्लादेशमधील Gen-Z आपली सरकार बदलू शकतात, तर भारतातील Gen-Z पेपर लीक करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवू शकत नाहीत का? भाजप सरकारच्या संरक्षणाखाली भाजप नेत्यानेच NEET चा पेपर लीक केला. NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणात भाजप नेते दिनेश बिंवाल यांच्या अटकेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की देशाची शिक्षण व्यवस्था माफिया आणि सत्तेच्या संगनमताची बळी ठरत आहे. ३० लाख रुपयांत पेपर खरेदी करण्यात आला आणि नंतर तो अनेक लोकांना विकला गेला. प्रश्न सरळ आहे जेव्हा-जेव्हा पेपर लीक होतो, तेव्हा भाजप नेते, भाजप कनेक्शन आणि भाजप नेत्यांकडून आरोपींना संरक्षण दिल्याच्या गोष्टीच समोर का येतात? डबल इंजिन भाजप सरकारमध्ये प्रत्येक मोठ्या पेपर लीकचा धागा भाजप नेत्यांपर्यंतच का पोहोचतो?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात खळबळ उडाली असून लाखो विद्यार्थ्याचे भविष्य टांगणीला लागले आहे. केंद्र सरकारकडून परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. केंद्र सरकारकडूनदेखील याविषयी अतिशय गंभीर पावले उचलली जात असून आता थेट CBI कडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.