Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…ते आमचे मुसलमान आहेत, त्यांच्यासाठी योजना राबवल्या तर काय; भाजप नेते नितेश राणे नेमकं म्हणाले काय?

भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधीमंडळाच्या आवारात त्यांनी हा संवाद साधला. यावेळी त्यांच्यासाठी राष्ट्रप्रेमी मुस्लीम बांधव महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 26, 2025 | 06:20 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचा आका विनायक राऊत की वैभव नाईक?; मंत्री नितेश राणे यांचं विधान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचा आका विनायक राऊत की वैभव नाईक?; मंत्री नितेश राणे यांचं विधान

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले आहे. अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे अंतिम प्रस्ताव मांडण्यात आले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये नेत्यांमध्ये खडाजंगी दिसून आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील इलेक्ट्रिक गाड्या आणि त्यावरील कर याबाबत माहिती दिली. यानंतर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राणे यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले.

काय म्हणाले नितेश राणे? 

विधीमंडळाच्या आवारामध्ये मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हे नितेश राणे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार आहे. वादग्रस्त आणि भडकाऊ विधान करत असल्यामुळे तक्रार करणार असल्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला. याबाबत नितेश राणे म्हणाले की, हिंदू समाजाची बाजू घेणं म्हणजे समाजाची माथी फिरवणं हे कोणत्या चौकटीमध्ये आहे ते माहिती नाही. मुळामध्ये आपल्या देशामध्ये 80 टक्के लोक हे हिंदू आहेत. हिंदू समाजाला सातत्याने सणसूद सुद्धा साजरे करु दिले जात नाही. त्यांच्या सणावेळी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले जातात. हिरवे झेंडे फडकवले जातात. लव्ह जिहादच्या नावाखाली आमच्या भगिनींच्या विरोधात षडयंत्र केले जात असेल तर या सगळ्याचे समर्थन हे संबंधित तक्रारदार करत आहेत का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्यापूर्वी त्यांनी एकदा खुल्या मैदानात माझ्याबरोबर चर्चा करावी. मी नेमकी मांडणारी जी भूमिका आहे त्यामध्ये त्यांना कोणता आक्षेप असेल तर. आपल्या देशामध्ये राहून आपल्या देशाच्या विरोधात जर कोणी भूमिका घेत असेल. पाकिस्तान झिंदाबाद म्हणत असेल तर…हिरवा झेंडा फडकवत असेल तर खान यांचे समर्थन आहे का? त्याच्याबद्दल देखील एक पान लिहिलं पाहिजे. आमची भूमिका समजून घ्यायची नाहीये. भूमिका समजून न घेता नितेश राणे वाईट दिसतो. पण हिंदू समाजावर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यांच्यावर लव्ह जिहाद करण्याचे प्रयत्न सुरु आहे. यामुळे हिंदू समाजाच्या बाजूने आम्ही उभे राहत असू तर त्यात आम्ही चुकलो कुठे? आम्ही पाकिस्तानमध्ये उभे नाही. भारतात आहोत. येथे हिंदू समाज सुद्धा राहतो. ते जर माझ्यासोबत चर्चेला आले तर मी त्यांच्यासोबत चर्चेसाठी तयार आहे,” असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे नितेश राणे यांनी त्यांच्यासाठी भारताचे मुस्लीम कसे आहेत हे सांगितले आहे. ते म्हणाले की, “देशामध्ये राहून भारतासाठी अभिमान बाळगणारे, तिरंग्याप्रती अभिमान बाळगणारे, वंदे मातरम बोलतात. आमच्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात. पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात. कोणीही जिहाद्यांनी आमच्या हनुमान जयंती आणि गणेश चतुर्थीवेळी दगडफेक करतात त्यांचे जे विरोध करतात,ते आमचे मुसलमान आहेत ना. त्यांच्यासाठी काही योजना आणल्या जात असतील तर त्या चुकीचं काय आहे? आमच्या राष्ट्रप्रेमी मुस्लीम बांधवांच्या विरोधात आम्ही कालही नव्हतो आजही नाहीये,” अशी भूमिका मंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे.

 

Web Title: Bjp minister nitesh rane controversial statements on muslim community complained to pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • BJP
  • Mahayuti Government
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
3

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
4

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.