भाजप मंत्री नितेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणारी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राज्याचे वातावरण तापलेले असताना आणखी प्रकरणे समोर येत आहेत. सत्ताधारी नेत्यांचे कार्यकर्ते एकप्रकारे गुंडागिरी करत असल्याचे आरोप केले जात आहेत. धनंजय मुंडे, सुरेश धस यांच्यानंतर आता भाजप नेते व आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणेच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लिम व्यक्तीस मारहाण करत जय श्रीराम म्हणण्याचा करत होते आग्रह केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधीमंडळाच्या आवारामध्ये या मुस्लीम कुटुंबाने येत न्यायाची मागणी केली आहे. पीडित मुस्लीम दाम्पत्य हे कणकवलीमधील असल्याचे सांगितले जात आहे. या पीडित व्यक्तीचे नाव अशरफ शेख असे असून ते पत्नीसह विधीमंडळाच्या आवारामध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर त्यांची व्यथा मांडली असून न्यायाची मागणी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अशरफ शेख यांच्या पत्नी यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, कणकवलीमध्ये आम्ही एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो. तिथून येताना पनवेलमध्ये ही घटना घडली. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मी एकटी हिजाब घालून होते. तिथे सगळी कॉंलेजची 30 ते 35 लोक होते. ते आम्हाला बघून जय श्रीराम अशा घोषणा देत होते. ते यावर थांबले नाहीत. त्यांनी आम्हाला जय श्रीराम म्हणा म्हणून दबाव टाकला. त्यानंतर त्यांनी मला आणि माझ्या नवऱ्याला मारहाण केली. आम्ही पनवेलला तक्रार केली, असे त्या महिलेने सांगितले.
याचबरोबर अशरफ शेख यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. मडगाव एक्सप्रेस ट्रेनमध्ये जय श्रीराम बोलण्यासाठी आमच्यावर दबाव आणला, आम्ही बोलण्यास नकार दिला तेव्हा त्या मुलांनी माझ्या ४ वर्षाच्या मुलीवर चहा फेकली. मला आणि बायकोला मारहाण केली. याची तक्रार ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली. रेल्वेने पनवेलमध्ये मदत मिळेल सांगितले, पण तोपर्यंत सगळे आरोपी पळून गेले. पनवेलची केस कणकवली येथे ट्रान्सफर करण्यात आली. कणकवली आम्ही जबाब द्यायला गेलो तेव्हा तिथे नितेश राणेंसमोर कार्यकर्त्यांनी आम्हाला मारले. आमच्या घरी येऊनही आम्हाला मारहाण करण्यात आली. तालुका अध्यक्ष सोनू सावंत, वरवडे गावचा उपसरपंच अमोल बोंद्रे असे अनेक कार्यकर्ते होते त्यांनी मारल्याचं अशरफ शेख यांनी दावा केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, आम्हाला न्याय हवा. आमच्यासोबत जो अन्याय झाला त्यात न्याय द्या. २५ जानेवारी २०२४ ला घटना घडली होती. आरोपींना अटकच केली नाही. नितेश राणेंचा राजीनामा घ्या आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी अशरफ शेख यांच्या कुटुंबाने केली आहे. त्यात ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत कारवाईची मागणी केली आहे.
बातमी अपडेट होत आहे.