
Harshvardhan Sapkal Criticized CM Devendra Fadnavis
Maharashtra Politics : राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ अभियानावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार पलटवार केला. राहुल गांधी यांच्या अभियानामुळे भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची झोप उडाली असून त्यातूनच अपप्रचार सुरू असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, ‘छात्रों की गुंज’ या अभियानाला विशेषतः विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजप अस्वस्थ झाला आहे. मागील १३ वर्षांत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी नेमके काय केले, याचे उत्तर आधी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
सपकाळ यांनी विविध भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत भाजप सरकारवर निशाणा साधला. NET, TET, तलाठी, MPSC, न्यायालयीन भरती, पुणे महापालिका आणि MMRDA भरतीसह अनेक परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून सरकार त्यावर उत्तर देऊ शकत नसल्याचा दावा त्यांनी केला.
Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात
महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा विरोध असल्याचा आरोप फेटाळून लावत सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची सुरुवात काँग्रेसनेच केली होती. महिला आरक्षणाला विरोध नसून, त्यामागे डिलिमिटेशन विधेयक आणण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत, महिलांना संधी द्यायची असेल तर आधी भाजपने आपल्या पक्षात उदाहरण घालून द्यावे, असे म्हटले.
वंदे मातरमच्या मुद्द्यावरही सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. वंदे मातरमला काँग्रेसचा विरोध असल्याचा प्रचार चुकीचा असल्याचे सांगत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसच्या भूमिकेचा उल्लेख केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये आधी वंदे मातरम सुरू करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली
भाजप इतिहास, संविधान, महिला आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप करत सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘Get Well Soon देवेंद्र फडणवीस’ असा टोला लगावला. दरम्यान, या वक्तव्यांमुळे राज्यातील काँग्रेस-भाजप वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.