महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
महाराष्ट्रामधील सर्वात मोठे लैंगिक अत्याचार प्रकरण आणि अंधश्रद्धेचे जाळे समोर आले. मात्र यावर महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. महिलांसंबंधित मोठे प्रकरण समोर आल्यानंतर देखील कोणतीही भूमिका न घेतल्यामुळे विरोधकांनी मंत्री आदिती तटकरे यांच्यावर टीकास्त्र डागले, भूमिका न घेणे हे संशयास्पद असल्याचे देखील महाविकास आघाडीचे नेते म्हणू लागले. यानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगितले आहे.
हे देखील वाचा : “तेव्हा खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता..; रुपाली चाकणकरांवर अंजली दमानिया भडकल्या
काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे?
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांचा 20 मार्च रोजी प्रतिक्रिया दिलेला व्हिडिओ शेअर केला आहे. याचबरोबर लिहिले आहे की, “नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीने व न्यायाच्या दृष्टीने सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे. राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्परतेने SIT स्थापन करून, अशोक खरातला अटक करून कारवाईला गती दिली आहे. राज्यातील सक्षम महिला पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रिमंडळासोबत एक मंत्री व एक महिला म्हणून या प्रकरणाबाबत माझ्याही भावना अत्यंत तीव्र आहेत. या भावना मी वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या व्यासपीठांवर ३-४ वेळा मांडल्या आहेत. या प्रतिक्रियांच्या लिंक्स मी खाली जोडत आहे”
नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीने व न्यायाच्या दृष्टीने सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे. राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्परतेने SIT स्थापन करून, अशोक खरातला अटक करून कारवाईला गती दिली आहे. राज्यातील सक्षम महिला पोलीस… pic.twitter.com/XXIUfx8bmb — Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 31, 2026
हे देखील वाचा : “हमाम में सब नंगे” प्रमाणे सगळेच उघडे पडले…; अशोक खरात प्रकरणावर खासदार राऊतांची टीका
पुढे आदिती तटकरे यांनी लिहिले आहे की, महिलांच्या सन्मानासाठी, सक्षमीकरणासाठी व न्यायासाठी महिला व बालविकास विभाग सदैव तत्पर आहे, सज्ज आहे. महिलांवर होणारा कोणताही अन्याय खपवून घेणार नाही या आमच्या भूमिकेचा मी पुनरुच्चार करते, असे मत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.






