
MP Sanjay raut Press Conference on LPG Gas shortage in maharashtra
खासदार संजय राऊतांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील गॅस तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, “सरकारवर एलपीजीच्या बाबतीत विश्वास ठेवू नका. कारण हे पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी किंवा लालबहाद्दूर शास्त्री यांचे सरकार नाही. गॅसचा तुटवडा राज्यभर आणि देशभर आहे. तरीही सरकार सांगत असेल की तुटवडा नाही तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. लोकांच्या गॅस एजन्सीबाहेर रांगा लागल्या आहेत. त्या रांगा काय AI ने बनवल्या आहेत का?” असा प्रश्न खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : Black Box सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा संताप अनावर
पुढे ते म्हणाले की, “आज मुंबईमध्ये 40 टक्के रेस्टारंट बंद आहेत. मुंबईमध्ये शाळांच्या कटिंगमध्ये एलपीजी मिळत नाहीये. खाण्याच्या वडापावच्या वगैरे गाड्या असतात, त्याही 50 टक्के बंद आहेत. तुम्ही म्हणत आहात की, परिस्थिती चिंताजनक नाही, काही अडचणी नाही. तुम्ही खोटं बोलू नका. अनेक प्रमुख जे देवालय आहेत, काशी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ आहे. तिथे जे अन्नपूर्णा मंदिर आहे, तिथे गेले 40 वर्ष अखंड दोन वेळा भक्तांना जेवण दिले जाते. पण आता ते अन्नछत्र एलपीजी गॅलच्या तुटवड्यामुळे बंद झालेले आहे. शिर्डीमध्येही तशीच परिस्थिती आहे. दोन लाडू प्रसादाचे द्यायचे आता ते एकच देतात. आपण हिंदुत्ववादी आहात ना… मग निदान देवळांनातरी एलपीजी द्या,” अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी टीका केली.
हे देखील वाचा : आधार कार्ड होणार अधिक सुरक्षित, UIDAI ने सुरु केला खास प्रोग्राम! एक्स पोस्ट शेअर करत दिली माहिती
राज्य सरकारवर देखील त्यांनी हल्लाबोल केला. खासदार राऊत म्हणाले की, “मराठवाडा आणि विदर्भात जास्त मदत करणे आवश्यक आहे. मग तिथे विरोधी पक्षाचे आमदार का असेना तिथेही विकासनिधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. बॅकलॉग असणाऱ्या ठिकाणी मदत करणे गरजेचे आहे. सरकार अनैतिक पद्धतीने निधी वाटप करत आहे. ज्यावेळी तुम्ही अध्यक्षाच्या पदावर बसलेले असता त्यावेळी तुमच्याकरिता सर्व पक्ष एकसारखी असतात मग तो सरकार असलेला पक्ष देखील. विधासभेचे अध्यक्ष असतील किंवा लोकसभेचे अध्यक्ष ते पूर्णपणे राजनैतिक दृष्टिकोनातून काम करतात. विधानसभाध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष पदावरील व्यक्ती निष्षक्ष असावी,” अशी अपेक्षा खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली.