
Opposition leaders Rahul Gandhi and Arvind Kejriwal criticize Modi government over gas shortage
देशामध्ये गॅसचा पुरवठ्यामध्ये कमतरता जाणवत असल्यामुळे सरकारने घरगुती गॅस खरेदीवर काही नियम घातले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये ESMA कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा फटका सामान्य माणसांच्या घरामध्ये जाणवत असल्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे परराष्ट्रीय धोरणाचे अपयश असल्याचे देखील विरोधकांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा : गॅसच्या तुटवड्यावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; संपूर्ण देशात ESMA कायदा लागू
आप नेते अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. केजरीवाल यांनी लिहिले आहे की, देशभरात, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये वगळता सर्व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी गॅस पुरवठा खंडित करण्यात आला आहे. फक्त घरगुती वापरासाठी गॅस पुरवला जाईल. येत्या काळात गॅस आणि तेलाची परिस्थिती आणखी बिकट होण्याची अपेक्षा आहे. काही मजबुरींमुळे मोदी ट्रम्पसमोर झुकत आहेत. त्याचे परिणाम आज देश भोगत आहे का? असा सवाल आप नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
देश भर में, शैक्षणिक संस्थानों और अस्पतालों को छोड़कर, बाक़ी सभी कमर्शियल संस्थानों को LPG गैस की सप्लाई बंद कर दी गई है। केवल घरेलू उपयोग के लिए गैस दी जाएगी। आने वाले दिनों में गैस और तेल की स्थिति और खराब होने के आसार हैं। मोदी जी अपनी किन्हीं मजबूरियों के चलते ट्रम्प के… https://t.co/eBsdwpPKTc — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 10, 2026
त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील या गॅसच्या तुटवड्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचे गंभीर नुकसान होत आहे, परंतु आपल्या तडजोड केलेल्या पंतप्रधानांकडे त्यावर चर्चा करण्याचे धाडस नाही. शेअर बाजार घसरत आहे, एलपीजीच्या किमती वाढत आहेत आणि जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचत आहेत – या सर्वांचा थेट परिणाम सामान्य माणूस, घरगुती बजेट आणि लघु आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांवर होत आहे. पंतप्रधान मोदींना ब्लॅकमेल केले जात आहे. त्यांच्याकडे भारतीय जनतेचे हित विकण्याशिवाय पर्याय नाही. माझे शब्द लक्षात ठेवा, ते संसदेत येणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतला आहे.
हे देखील वाचा : भारताला बसली युद्धाची झळ! LPG गॅसचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना
या परिस्थितीवर समाजवादी पक्षाच्या खासदार इकरा हसन म्हणाल्या की, “एलपीजीच्या किमती आधीच वाढल्या आहेत. आम्हाला अनेक ठिकाणाहून तुटवड्याची माहिती मिळत आहे. आम्हाला कच्चे तेल मिळेल की नाही हे देखील माहित नाही. हे आमच्या सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे… मला माहित नाही की आमच्या सरकारसमोर कोणत्या सक्ती आहेत की त्यांनी हार मानली आहे आणि अमेरिका आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आदेश देत आहे. आपण ‘इंडिया फर्स्ट पोलिसी’ स्वीकारली पाहिजे. पण आजचे सरकार देश विकण्याचे काम करत आहे.”असा आक्रमक पवित्रा समाजवादी पार्टीच्या खासदारांनी घेतला आहे.