
संजय राऊत म्हणाले, प्रफुल्ल पटेल ज्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये असे म्हणत आहेत, त्याअर्थी अमित शाहांचीदेखील हिच इच्छा आहे. या सगळ्यात भाजपचा अदृश्य हात आहे. सगळकाही अमित शाहांच्या इच्छेनुसार होईल. प्रफुल्ल पटेल बोलत आहेत म्हणजे अमित शाहा बोलत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर सगळी सुत्रे अमित शाहांच्या हातात गेली आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडेही कोणतेही नियंत्रण उरलेले नाही.
Maharashtra Crime: गोंदियाची तरुणी प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशात गेली आणि
प्रफुल पटेल ज्याअर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये, असे म्हणत आहेत, त्याअर्थी ही अमित शाह यांची इच्छा आहे. या सगळ्यात भाजपचा अदृश्य हात आहे. सगळं काही अमित शाह यांच्या इच्छेनुसारच होईल. प्रफुल पटेल बोलत आहेत म्हणजे अमित शाहच बोलत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे अमित शाह यांच्यात हातात गेली आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला १० तोंडे फुटली आहेत. अजित पवार हा एकखांबी तंबू होता. तो कोसळून पडल्यानंतर आता उंच, खोडे, बैल बेभान धावू लागले आहेत. फ्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरच अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूविषयी पवार कुटुबातून हल्ले होत आहेत. आमदार रोहित पवारांनीच काही पुरावे समोर आणले आहेत. त्या पटेल आणि तटकरे यांनाही पुराव्यांच्या आधारे उत्तर द्यावे, असेही संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हटलं आहे.
अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही. त्याऐवजी तो दडपण्याचा प्रयत्न केला जाईल. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकां पाहता अपघाताचा तपास खरोखरच त्या दिशेने सुरू आहे का, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या कंपनीच्या मालकी हक्काबाबत त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. VSR विनान कंपनीत कोणाचे ‘अदृश्य हात’ आहेत आणि त्या कंपनीचा खरा ‘बेनामी’ मालक कोण, ही माहिती जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत या अपघाताचे सत्य जनतेच्या समोर येणार नाही,” असा दावा त्यांनी केला.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवारा घेत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून सरकारला धारेवर धरले आहे.
“मंत्रालयातील विधानसभा उपाध्यक्षांचे कार्यालय सील केले जाणे, ही लोकशाहीसाठी अत्यंत लाजीरवाणी घटना आहे. झिरवाळ यांनी आता पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे,” असे राऊत यांनी स्पष्टपणे म्हटले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीशिवाय इतक्या मोठ्या घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या कार्यालयावर ‘एसीबी’ची कारवाई होणे शक्य नाही,” असा दावा करत राऊत यांनी या कारवाईमागे राजकीय संमती असल्याचा आरोप केला.