
'मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर राजकारण?' राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल; सभेत केली मिमिक्री
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार, 9 जुलै) रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरदस्त टीका टीका केली. मिसिंग लिंक दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या विधानांवरून राज ठाकरे यांनी आज चांगलयच शब्दांत समाचार घेतला. यावेळी त्यांनी त्यांनी नफडणवीसांची मिमिक्री देखील केली. तसेच, सरकारवर हल्लाबोल करून सत्तेतील लोकांच्या मुजोरीबाबतही सवाल उपस्थित केले.
राज ठाकरे यांनी आपल्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मिसिंग लिंक दुर्घटनेवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. यात मी लक्ष घालतो. ज्यांनी चुका केल्या, त्यांच्यावर चौकश्या लावतो, असं बोलायला हवं होतं. ते राहीलं बाजूला. राजकारण करेल त्याला बघून घेईल. सुसंकृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस बघून घ्यायची कोणती भाषा आली. एक खासदारव सांगतो, बॉम्ब टाकेन. माझ्या नावावर पाच मर्डर आहेत. आपल्या राज्यात होऊ शकत कारण ते सत्तेत आहेत. हे बोलायची हिम्मत होते, कारण कुणाचा कुणावर अंकुश नाही.”
फडणवीसांवर टीका करत ते पुढे म्हणाले, “मिसिंग लिंकवर खांब कोसळला, पाणी आलं. म्हणे त्याच राजकारण करू नका. अरे वा. त्याच्यावर बोललं तर राजकारण. इतके दिवस तुम्ही काय करत होतात. दुसऱ्याचं सरकार असताना तुम्ही काय करत होतात. त्यावेळी आंदोलन झाली ते राजकारण नव्हतं? स्वतःच्या अंगाशी आल्यावर ते राजकारण. असं कसं होईल? म्हणे, एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा.. लोक त्या मिसिंग लिंकवर बोलतात. महाराष्ट्राचा कुठे अपमान करतात. यांना केंद्र सरकारची सवय लागली आहे. केंद्राच्या कोणत्या गोष्टीवर बोललं तर तुम्ही देशद्रोही.”
“आता केंद्राची कामे आहेत तर देशाचा काय संबंध? मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कुठे झाला? लोकांनी प्रश्न विहारायचे नाही का? इतके दिवस मोबाईलवरून विरोधकांना शिव्या घालायचे ते अंगलट आलंय. दामदुपटीने यांच्या अंगलट आलं. आता त्रास होतंय. तुम्हीच सुरु केल्या या गोष्टी. 10-12 वर्षात तुम्हीच सुरु केलं. वाईट साईट बोलणं. घाण बोलणं, तुमच्या टीमने केलं. तुमच्या अंगावर आल्यावर कसा आला महाराष्ट्राचा अपमान?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोठा निर्णय! फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक
मिसिंग लिंक दुर्घटनेनंतर राज्याच्या राजकीय वातावरणात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी मोठ्या प्रमाणात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल केला. त्यानंतर फडणवीसांनीं पावसाळी अधिवेशनात याबाबत बोलताना उलट विरोधकांवरच निशाणा साधत ‘महाराष्ट्राला बदनाम करू नका‘ असे वक्तव्य केले. यावरून आता मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या असून राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.