
Rohini Khadse slams Maharashtra MInisters over Using EV Cars
पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीविषयी देशवासियांना केलेल्या आवाहनानंतर देशभरातील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यात मोठी घाट केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातसुद्धा याचे मोठे पडसाद पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधीच आपल्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधत आपल्या वाहनांचा ताफा कमी करत असल्याचे सांगितले आहे. याशिवाय ते इलेक्ट्रिक वाहनांमधूनच प्रवास करताना दिसून आले. मंत्री नितेश राणे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री उदय सामंत, भाजप नेते प्रवीण दरेकर हेदेखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. यावरून रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून चांगलेच सुनावले आहे.
“गडकरी मुख्यमंत्री असते तर…” प्रणिती शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा
रोहिणी खडसे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत म्हणाल्या, “जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. तेव्हापासून आपल्या राज्यातील मंत्री-संत्री नव्या कोऱ्या EV Car घेत सुटलेत. लोकांना हे एकाप्रकारे ईव्ही कार घेण्याचे आवाहन करत आहेत.”
“आज पावसाळा तोंडावर आहे, पेरणीचे दिवस सुरू झालेत. या अत्यंत गरजेच्या काळात माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास सहन करावा लागतोय. त्याला वेळेत वीज मिळत नाहीये. याचा विचार सत्ताधारी करणार आहेत का ?”
जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. तेव्हापासून आपल्या राज्यातील मंत्री-संत्री नव्या कोऱ्या #EVCar घेत सुटलेत. लोकांना हे एकाप्रकारे ईव्ही कार घेण्याचे आवाहन करत आहेत. आज पावसाळा तोंडावर आहे, पेरणीचे दिवस सुरू झालेत. या… pic.twitter.com/gm6GSBdyYA — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 16, 2026
“या मंत्र्या-संत्र्यांना काय आहे? यांना तर कुठंही वीज उपलब्ध होईल, हे बेसुमार वीज वापरतील. पण हा खड्डा माझ्या शेतकऱ्यांच्या सोसावा लागेल ना ! सगळ्यांनीच जर ईव्ही कार वापरायला सुरुवात केली तर काही दिवसांनी राज्यात विजेचाही तुटवडा जाणवेल आणि आता ८ तास असणारे लोडशेडींग उद्या १५-१६ तासांवर पोहोचेल..”
“जरा भान ठेवून वागा, माझ्या शेतकऱ्यांचा जरा विचार करा ! सगळ्याच गोष्टी काय पीआर आणि मार्केटिंगसाठी कसे करता ?” असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
“माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या,” ED चौकशीनंतर रुपाली चाकणकरांचे मोठे वक्तव्य