
Rohit Pawar Press Conference on ajit pawar accident
रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून जोरदार आगपाखड केली आहे. अजित पवारांच्या अपघातपप्रकरणी अहवालाची वाट बघूया असे वक्तव्य करणाऱ्या काही नेत्यांवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका करत सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न असे शब्द वापरत टीकास्त्र सोडले आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होतंय. नियमानुसार एक वर्षाच्या आत AAIB चा अंतिम अहवाल येणं बंधनकारक असतं, परंतु अद्यापही अहवाल आलेला नाही! AAIB च्या तपासात क्रिमिनल अँगल नसतो, अहवाल वेळेवर येत नाही हे माहीत असूनही “अजितदादांच्या अपघात प्रकरणाचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट… pic.twitter.com/c7y56v3M3s — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 11, 2026
आपल्या पोस्टमधून ते म्हणाले, “अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होतंय. नियमानुसार एक वर्षाच्या आत AAIB चा अंतिम अहवाल येणं बंधनकारक असतं, परंतु अद्यापही अहवाल आलेला नाही! AAIB च्या तपासात क्रिमिनल अँगल नसतो, अहवाल वेळेवर येत नाही हे माहीत असूनही “अजितदादांच्या अपघात प्रकरणाचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट बघूया”, असं जे म्हणतात ना ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं आहेत. मैत्री, नातीगोती केवळ भाषणामध्ये बोलायला आहे का, प्रत्यक्षात मात्र काहीच नाही का? असा प्रश्न पडतो.” रोहित पवारांच्या या ट्विटमुळे त्यांनी हि अप्रत्यक्ष टीका नेमकी कोणावर केली आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाची कंपनी असलेल्या VSR कंपनीच्या मालकांवर कारवाई करण्यासाठी रोहित पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता अजितदादांच्या दुर्देवी अपघातात दादांसह मृत्यू झालेल्या पिंकी माळी व विदीप जाधव या स्टाफला इन्शुरन्स मिळण्याबाबत त्यांनी VSR कंपनीवर टीका केली होती. ‘पिंकी माळी व विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना VSR कंपनीकडून जो इन्शुरन्स देण्यात येणार होता त्याबाबत VSR कडून सातत्याने टाळाटाळ होत असून सरकारकडून त्या कंपनीच्या मालकाशी संपर्क करून जाधव व माळी कुटुंबाला विम्याचे पैसे देण्यासंदर्भात प्रयत्न होंत नाहीत हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हंटले होते. तसेच, ‘सरकारकडून दोन्ही पिडीत कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत जाहीर केली होती ती मदतदेखील या कुटुंबांना मिळालेली नसल्याचे त्यांनी याआधी स्पष्ट केले होते.
‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले’; खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान