धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथे आयोजित जाहीर सभेत भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. बंडखोर खासदार oमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघातील या सभेत बोलताना त्यांनी जोरदार निशाणा साधला. यावेळी खासदार संजय राऊत यांनीही ओमराजेंचा चांगलाच समाचार घेतला.
शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या या सहा खासदारांच्या मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे हे मेळावे घेत असून स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज (रविवार, 28 जून) धाराशिव येथे आयोजित सभेत संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर कडाडून टीका केली. तसेच, सुमारे 500 कोटी रुपयांचे प्लॉट खरेदीचे आरोपही त्यांनी केले.
संजय राऊत यांनी आरोप केला की, ओमराजे निंबाळकर यांच्या संबंधित कंपनीने धाराशिवमध्ये सुमारे 500 कोटी रुपयांचे प्लॉट खरेदी केले असून, या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू असल्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच गरिबांच्या नावाने कथित बनावट खाती उघडणे, आर्थिक गैरव्यवहार आणि इतर कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांचाही त्यांनी उल्लेख केला. “चौकशीच्या भीतीनेच त्यांनी पक्ष सोडला,” असा दावा राऊत यांनी केला.
सभेत संजय राऊत यांनी आमदार कैलास पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक करत, “उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही,” अशी त्यांची भूमिका निष्ठेचे उदाहरण असल्याचे म्हटले. ओमराजे निंबाळकर यांचा उल्लेख करत त्यांनी, निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे भाषण केले होते, मात्र नंतर त्यांनी पक्षांतर केल्याची टीका केली. तसेच, ते “100 कोटींना विकले गेले” असा आरोपही त्यांनी केला.
सभेत खासदार संजय राऊत यांनीही ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी निंबाळकर यांच्या कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तसेच विविध कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख करत ते शिंदे गटात गेले असल्याचा दावा केला.
‘शिंदे राम तर फडणवीस लक्ष्मण’; खासदार ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्याने महायुतीत नव्या वादाची ठिणगी
राऊत यावेळी म्हणाले, “हा भामटा का गेला? कारण त्याने प्रचंड भ्रष्टाचार केलाय. आता मला असेही वाटत आहे कि त्याच्या वडिलांचा जो खून झाला आहे. त्या खुनामागेदेखील वेगळं काहीतरी रहस्य आहे. हा गेला कारण पवनराजे मल्टीस्टेट या त्याच्या कंपनीने 500 कोटींचे प्लॉट अक्ख्या धाराशिवमध्ये खरेदी केले आहेत. त्याची ईडीकडून चौकशी लागली म्हणून तो शिंदे गटात गेला. हा घाबरून शिंदे गटात गेला आहे. वडिलांच्या नावाने स्थापन केलेल्या गरिबांच्या नावाने बनावट खाती उघडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. तेरणातील भंगार विकून त्याने पैसे खाल्ले, असे अनेक गुन्हे केले म्हणून या सगळ्यांची चौकशी लागली म्हणून हा डरपोक सोंगाड्या पक्ष सोडून गेला. 15-20 वर्ष एका सापाला दूध पाजले होते पण आता त्याचा फणा ठेचायची वेळ आली आहे,” असे राऊत म्हणाले.






