
दिल्लीतील लाठीमारानंतर उद्धव ठाकरे आक्रमक! सरकारला दिला 'हा' मोठा इशारा (Photo Credit- X)
शिवतीर्थावर जमलेल्या अथांग तरुणाईला संबोधित करताना उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक झाले होते. ते म्हणाले, “चार दिवसांत आपण दुसऱ्यांदा या जागेवर भेटलो आहोत. परवा मी दिल्लीला गेलो होतो, आता रविवारी पुन्हा भेटणार आहोत. आपण सर्व भारतीय आहोत, हीच आपली खरी ओळख आहे. दिल्लीत ज्या अमानुष पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यावरून मी आता या सरकारला स्पष्ट इशारा देतोय.” सरकारला थेट आव्हान देत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “तुमच्या हातात लाठ्या आणि बंदुका असतील, पण आमच्या हातात हा तिरंगा आहे! या तिरंग्याशी लढण्याची हिंमत आजपर्यंत कोणाचीही झालेली नाही. या, तुम्ही लाठ्या-बंदुका घेऊन समोर या, मी तिरंगा घेऊन येतो. बघू तुमची हुकूमशाही जिंकते की आमचा तिरंगा जिंकतो!”
#WATCH | Mumbai | Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray holds a Tiranga Rally in Dadar in support of students protesting over the NEET paper leak issue (Video Source: Shiv Sena (UBT) pic.twitter.com/am8jGAdRpA — ANI (@ANI) July 24, 2026
आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची पुनरुच्चार केला. “सोनम वांगचुक यांचे उपोषण सुटले असले तरी विद्यार्थ्यांचे मुख्य आंदोलन संपलेले नाही. दिल्लीत अभिजित दीपके आणि इतर तरुण आजही न्यायासाठी लढा देत आहेत. आपला हा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलाच पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी सवाल केला, “आपल्याच सहकाऱ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्यांचे तुम्ही मित्र होऊ शकता का? जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आपण शांत बसायचे नाही!”
मला एक प्रश्न पडला आहे. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? दिल्लीत सध्या जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे, त्या आंदोलनाला हाताळताना विद्यार्थ्यांवर सर्रास लाठीचार्ज केला जात आहे. हा लाठीचार्ज अगदी हलक्या स्वरूपात गर्दी पांगवण्यासाठी केला जात असता तरी एकवेळ ठीक, पण हा म्हणजे कुठलातरी सूड उगवल्यासारखा केला जात आहे. जे व्हिडीओज समोर येत आहेत त्यात फक्त आंदोलनकर्ते विद्यार्थीच नाही तर आसपास असणाऱ्या अनेकांना सर्रास तुडवलं जात आहे. आणि पोलीस अशी कृत्य करत आहेत याचा अर्थ त्यांना असे आदेश आल्याशिवाय तर हे होऊच शकत नाही.
मुळात आंदोलन का झालं? तर NEET परीक्षेत गोंधळ झाले ज्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला त्या रागातून ही मुलं रस्त्यावर उतरली. त्यांच्या समर्थनार्थ इतर विद्यार्थी पण उतरले. थोडक्यात हे आंदोलन विद्यार्थ्यांनी उभं केलं, मोठं केलं. मग विद्यार्थ्यांना मारण्याचं कारण काय होतं ? आणि हा अधिकार पोलिसांना दिलाच कोणी ? विद्यार्थ्यांना मारण्याची जशी शिक्षकांना परवानगी नाही तशी ती पोलिसाना पण नाही. पण तरीही हे का केलं गेलं ?
‘पोलिसांकडे ड्रग्स सहज उपलब्ध होतात का?’ व्हायरल व्हिडिओवरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल