Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : “ओबीसी समाजाचे खरे विरोधक हे आता भाजपा आहेत…; वंचित नेते प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले

महायुती सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सहा मागण्या पूर्ण केल्या आहेत. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 09, 2025 | 02:53 PM
VBA Prakash Ambedkar on Maratha reservation given by mahayuti government

VBA Prakash Ambedkar on Maratha reservation given by mahayuti government

Follow Us
Close
Follow Us:

Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण केले. ऐन गणेशोत्सवामध्ये त्यांनी आझाद मैदानावर पाच दिवसीय उपोषण केले. त्यांच्या यामधील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यामधील हैदराबाद गॅझिट लागू करण्यात आले आहे. याला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्यानंतर आता आणखी एक नेता विरोधामध्ये उतरला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने कायद्याला धरुन हा निर्णय घेतलेला नाही असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

प्रकाश आंबेडकर आरक्षणावर भूमिका मांडताना म्हणाले की, सरकारचा निर्णय झाला त्यावेळी मी म्हणालो होतो की सरकारने हा निर्णय कायद्याला धरून घेतलेला नाही. ओबीसी आणि मराठा यांचे ताट वेगळे असले पाहिजे. यावेळी त्यांनी (औरंगाबाद) संभाजीनगर खंड पीठाच्या जजमेंटचा दाखला दिला. सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही असं त्यात नमूद करण्यात आलं होतं, आणि त्यावर सुप्रीम कोर्टातही शिक्का मोर्तब झालं आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले

पुढे ते म्हणाले की, “निझामी मराठा जो सत्तेत बसलेला आहे, त्याला गरीब मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावायचे आहे. निझामी मराठा हे सर्व सत्तेत आहेत, ते ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावतात. सरकारने जे सर्व मराठा ओबीसी आहेत, ही भूमिका घेतली आहे, त्याला ओबीसी विरोध करत आहेत. भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत, आणि आरक्षण असूच नये असे गोंधळ घालायला सुरुवात केली आहे,” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

प्रकाश आंबेडकर यांनी भाजप हा ओबीसींवर अन्याय करत असल्याचे सांगत जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “भाजप पक्षाकडून सांगितले जाते की आमचा डीएनए ओबीसी असल्याचे म्हटले जाते. पण ओबीसींनी हे समजून घेतलं पाहिजे की सर्वात मोठा शत्रू हेच आहे. मंडल कमिशन वाचवणे आता ओबीसींच्या हातात आहे. त्यांनी राजकीय अस्तित्व प्रस्थापित केले पाहिजे. दोन चार ओबीसी जिल्हा परिषदला निवडून येण्यापेक्षा, सर्व बॉडी ओबीसी कशी निवडून येईल असे प्रयत्न केले पाहिजे. ओबीसींना राजकीय धोका आहे हे ओळखून घेतले पाहिजे,” असा सावधगिरीचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

मराठा समाजाचे ताट वेगळे पाहिजे

मनोज जरांगे पाटील यांच्या टीममधील वकील(योगेश केदार) आहेत, त्यांनी सल्ले दिले, ते मान्य केले नाहीत. भाजप जे ओबीसी डीएनए म्हणत आहे ते संपलेले आहे, आणि ओबीसींचे खरे विरोधक आता भाजपा आहे अशी टीका आंबेडकरांनी केली. मराठा समाजाला न्याय देऊ शकतो पण त्यांचे ताट वेगळे पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

Web Title: Vba prakash ambedkar on maratha reservation given by mahayuti government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Maratha Reservation
  • political news
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, राजकीय पोळी भाजणाऱ्यांचा…; मंत्री जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?
1

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, राजकीय पोळी भाजणाऱ्यांचा…; मंत्री जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?

‘आमदार टक्केवारी घेतात अन् विकासही रोखतात’; सत्ताधारी शिवसेनेच्याच आमदाराचे विधान
2

‘आमदार टक्केवारी घेतात अन् विकासही रोखतात’; सत्ताधारी शिवसेनेच्याच आमदाराचे विधान

“काँग्रेसचा इतिहासच ओबीसींच्या विश्वासघाताचा…अहवाल कुजवले; भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात
3

“काँग्रेसचा इतिहासच ओबीसींच्या विश्वासघाताचा…अहवाल कुजवले; भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात

मोठी बातमी! आरक्षणाचा मुद्दा तापणार; ‘हा’ समाज आंदोलनाच्या तयारीत, सरकारची डोकेदुखी वाढणार?
4

मोठी बातमी! आरक्षणाचा मुद्दा तापणार; ‘हा’ समाज आंदोलनाच्या तयारीत, सरकारची डोकेदुखी वाढणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.