• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Adhyatma Ganapati Visarjan 7 Days Auspicious Time

‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…’ बाप्पाच्या विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता?

गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे आगमन अगदी थाटामाटात झाले. दीड दिवस, पाच दिवस, गौरी गणपती या बाप्पाचे विसर्जन झाले. आज 13 सप्टेंबर रोजी 7 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. तर त्यासाठी योग्य वेळ कोणती? योग्य ग्रहस्थितीत बाप्पाचे विसर्जन केल्यास ते शुभ आणि लाभदायक मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 13, 2024 | 12:09 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गणेशोत्सवामुळे देशात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं असून दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींना भक्तांनी निरोपदेखील दिला आहे. आता सात आणि दहा दिवसांच्या गणरायाचं देखील विसर्जन होणार आहे. सांगायचं झालं तर, गणेशोत्सव हा 10 दिवसांचा असतो, पण त्या आधीदेखील तुम्ही गणरायाचं विसर्जन करु शकता. जर तुम्हाला सातव्या दिवशी गणरायाचं विसर्जन करायचं असेल तर, त्यासाठी देखील शुभ मुहूर्त आहे. योग्य ग्रह-नक्षत्रा दरम्यान बाप्पाचं विसर्जन केल्यास ते शुभ आणि लाभदायक मानले जाते.

7 व्या दिवशी विसर्जनासाठी शुभ मुहूर्त

प्रातः मुहूर्त – सकाळी 06:05 – सकाळी 10:44 वा.

अपराह्न मुहूर्त – सायंकाळी 04:55 – सायंकाळी 06:28 वा.

अपराह्न मुहूर्त – दुपारी 12:17 – दुपारी 01:50 वा.

रात्री मुहूर्त – रात्री 09:23 – रात्री 10:50 वा.

रात्री मुहूर्त – प्रात: 12:17 – सकाळी 04:38, दि. 14 सप्टेंबर

हेदेखील वाचा- श्रीकृष्णाने पांडवांना कलियुगाचे सत्य आधीच सांगितले होते, जाणून घ्या

विसर्जनासाठी महत्त्वाचा दिवस कोणता?

गणरायासाठी भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भावना असते. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा असते. गणरायाच्या आगमनानंतर काही दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर निरोप देताना प्रचंड वाईट वाटते. या चार दिवसांचा गणपती उत्सव अधिक शुभ मानला जातो. पण सर्वात जास्त महत्त्व अनंत चतुर्थीला असते म्हणजेच गणपतीचा दहावा दिवस. दहाव्या दिवशी गणरायाची पूजा केली जाते आणि हा दिवस गणेश विसर्जन म्हणून ओळखला जातो.

हेदेखील वाचा- सप्टेंबर महिन्यातील एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

अनंत चतुर्दशी कधी आहे

यावर्षी अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर रोजी आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3.10 वाजल्यापासून सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी 17 सप्टेंबर रोजी रात्री 11:44 वाजता संपेल. मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी करण्यात येणार आहे.

गणेश विसर्जनाचा विधी

गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाची पूजा त्यांच्या आवडत्या वस्तूंनी केली जाते. दुर्वा, मोदक, लाडू, सिंधूर, कुमकुम, अक्षत, पान, सुपारी, लवंग, इलायची, हळद, नारळ, फूल, अत्तर, फळे अपर्ण करावीत. पूजेचा विधी करताना ॐ श्री विघ्नराजाय नमः। या मंत्राचा जप करावा.

घर किंवा मंडळात जेथे गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. तेथे आरती आणि हवन करावे, आता एका पाटावर गंगाजल शिंपडावे, त्यावर स्वास्तिक चिन्ह तयार करुन लाल कपडा अंथरावा.

गणपती प्रतिमा आणि त्यांना अर्पित करण्याची सर्व सामग्री पाटावर ठेवावी. त्यानंतर ढोल, ताशा आणि वाजंत्री सोबत आपल्या लाडक्या बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढावी.

त्यानंतर समुद्र, नदी किंवा पालिकेच्या कृत्रिम तलावावर बाप्पाला आणावे, त्यानंतर विसर्जनापूर्वी पुन्हा गणपती बाप्पाची कापूर पेटवून त्याने पुन्हा एकदा आरती करावी.

बाप्पाच्या पूजेत काही चूक वगैरे झाली असेल तर माफी मागावी, त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी बाप्पाला येण्याची विनंती करावी. ॐ गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ, स्वस्थाने परमेश्वर। यत्र ब्रह्मादयो देवाः, तत्र गच्छ हुताशन या मंत्राचा जप करीत बाप्पाच्या मूर्तीला हळूहळू पाण्यात सोडावे.

Web Title: Adhyatma ganapati visarjan 7 days auspicious time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 12:09 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi 2025:  संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?
1

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 9 मृत्यू, 12 बेपत्ता; कुठे कुठे काय काय घडले
2

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 9 मृत्यू, 12 बेपत्ता; कुठे कुठे काय काय घडले

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप
3

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता
4

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

ENG W vs SA W : इंग्लड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसमाने! कोणाच्या हाती लागणार ICC Women’s Cricket World Cup 2025 चा पहिला विजय?

ENG W vs SA W : इंग्लड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसमाने! कोणाच्या हाती लागणार ICC Women’s Cricket World Cup 2025 चा पहिला विजय?

महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल

महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

Papankusha Ekadashi 2025: पापकुंश एकादशीच्या दिवशी वाचा ही कथा, तुमची सर्व अपूर्ण कामे होतील पूर्ण

Papankusha Ekadashi 2025: पापकुंश एकादशीच्या दिवशी वाचा ही कथा, तुमची सर्व अपूर्ण कामे होतील पूर्ण

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral

What is E-Bond:आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

What is E-Bond:आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.