हिंदू धर्मात यमुनोत्री या ठिकाणाचं पावित्र्य मोठं आहे. असं म्हणतात यमुना ही सूर्यदेवांची कन्या आणि शनीदेव, यमराज यांची बहिण. यमुनादेवी ही शांततेचं प्रतीक मानलं जातं, स्कंदपुरणानुसार, अशी मान्यता आहे की, यमुनेच्या पाण्यात अंघोळ केल्याने अकाली मृत्यू येत नाही. या ठिकाणी स्नान केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला कमी वयात मृत्यू येऊच शकत नाही इतकं पावित्र्य या यमुनेच्या पाण्यात आहे असं म्हटलं जातं.
यमुनोत्री धाम हे उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात वसलेले अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. चारधाम यात्रेतील हे पहिलं ठिकाण म्हटलं जातं. . ३,२९३ मीटर उंचीवर यमुनोत्री धाम असून यमुनेच्या उगमस्थानी आहे आणि देवी यमुनेला समर्पित आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा डोळ्यांचं पारणं फेडतो. अशी माहिती आहे की, गढवालच्या राणीने या मंदिराची भव्य वास्तुकला केली.जरी या ठिकाणी चढणं आव्हानात्मक असली तरी, सभोवतालचे निसर्ग सौंदर्य आणि आध्यात्मिक वातावरणाने थकवा निघून जातो असं भाविक सांगतात.
यमुनोत्री धामची 5 न उलगडलेली आणि रंजक रहस्ये
यमुनोत्रीचा महिमा : यमुनोत्रीचे पाणी केवळ एक नदीचा प्रवाह नसून, ते भक्तांसाठी तीर्थ आहे. काही दंतकथेनुसार, या पाण्यात स्नान केल्याने केवळ पापांचा नाश होत नाही, तर मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धीही लाभते.
प्राचीन वास्तुकला – यमुनोत्री मंदिर संकुलातील अनेक लहान मंदिरं अत्यंत प्राचीन आहेत.स्थानिक आख्यायिकांनुसार, ही मंदिरं सत्ययुगातील आहेत. या मंदिरांची वास्तुकला आणि भगवान शिव व यमुना यांच्यातील अतूट नात्याच्या कथा आजही जिज्ञासू पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
सोन्यासारखा हिमालय – प्राचीन लोककथांमध्ये या प्रदेशाला सुवर्ण हिमालय म्हणून संबोधले जाते. असे मानले जाते की, प्राचीन काळी येथील शिखरे सोन्यासारखी चमकत असे आणि ती देवांचे निवासस्थान होते. आजही, जेव्हा सूर्याची पहिली किरणे या शिखरांवर पडतात, तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.प्राचीन लोककथांमध्ये या प्रदेशाला सुवर्ण हिमालय म्हणून ओळखलं जातं.
सूर्यकुंड – यमुनोत्रीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सूर्यकुंड. कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टीमध्येही, या तलावात उष्ण पाण्याचे झरे आहेत.
खरसाली- हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे जेव्हा मुख्य मंदिराचे दरवाजे बंद असतात, तेव्हा या गावात यमुना मातेची पूजा केली जाते. येथील प्राचीन शिवमंदिर त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे.
हनुमान चट्टी – गंगा आणि यमुना यांच्या संगमावर वसलेले हे ठिकाण शांतीचे प्रतीक आहे. भगवान हनुमानाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय यमुनोत्रीची तीर्थयात्रा अपूर्ण मानली जाते.
डोडीताल – हे सरोवर निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच ठरते. असं म्हणतात की, गणपती देवाचं जन्मस्थान मानले जाणारे हे सरोवर घनदाट जंगलांमध्ये वसलेले आहे.






