• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Kargil Vijay Diwas How Much Did India Spend In The Kargil War Who Suffered The Most Losses

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धात भारताने किती खर्च केला; सर्वाधिक नुकसान कुणाचे?

आर्थिक नुकसानापेक्षा जास्त नुकसान भारताने आपले ५२७ शूर सैनिक गमावले. तर या युद्धात १३६३ हून अधिक सैनिक जखमी झाले. हे असे बलिदान आहे जे कोणत्याही किंमतीत तोलता येणार नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 26, 2025 | 10:24 AM
Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धात भारताने किती खर्च केला; सर्वाधिक नुकसान कुणाचे?

कारगिल युद्धात भारताने किती खर्च केला; सर्वाधिक नुकसान कुणाचे?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Kargil Vijay Diwas:  कारगिल युद्ध हे केवळ एक लष्करी संघर्ष नव्हते; ते भारताच्या सार्वभौमत्वाची, धोरणात्मक कौशल्याची आणि सैनिकांच्या अदम्य धैर्याची कठोर परीक्षा होती. मे १९९९ मध्ये पाकिस्तानी सैन्य व दहशतवाद्यांनी मिळून कारगिलच्या उंच शिखरांवर कब्जा केला, तेव्हा भारताला स्वतःच्या सीमेतच युद्धाचा सामना करावा लागला. घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी हाती घेतलेले “ऑपरेशन विजय” दोन महिन्यांहून अधिक काळ चालले आणि २६ जुलै १९९९ रोजी भारताने प्रत्येक शिखरावर तिरंगा फडकवत विजय घोषित केला.

या युद्धाने भारतीय सैन्याची ताकद आणि देशातील जनतेचा एकत्रित पाठिंबा जगासमोर सिद्ध केला, मात्र या यशासाठी मोठी किंमत चुकवावी लागली. शेकडो जवानांनी बलिदान दिले, अब्जावधी रुपयांचा खर्च झाला आणि मोठ्या प्रमाणात लष्करी साधनसंपत्तीचा वापर झाल्याचे बोलले जाते. पण कारगिल युद्ध हे भारतासाठी केवळ लष्करी आव्हान नव्हते तर आर्थिक परीक्षा देखील होती. आकडेवारीनुसार, या युद्धात भारताने अंदाजे ५ ते १० हजार कोटी रुपये खर्च केले. एकट्या भारतीय हवाई दलाने ३०० हून अधिक हवाई हल्ले केले ज्यात सुमारे २००० कोटी रुपये खर्च झाले. त्याच वेळी, सैन्याच्या जमिनीवरील कारवाईचा खर्च दररोज सुमारे १० ते १५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. काही अहवालांनुसार, कारगिल युद्धादरम्यान भारताला दररोज १४६० कोटी रुपयांपर्यंत खर्च सहन करावा लागला. असे असूनही, त्यावेळी भारताची मजबूत अर्थव्यवस्था, ३३.५ अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा आणि १० अब्ज डॉलर्सच्या संरक्षण बजेटमुळे या संकटाला तोंड देण्याची ताकद मिळाली.

सर्वात मोठी किंमत म्हणजे आपल्या शूर सैनिकांचे हौतात्म्य

आर्थिक नुकसानापेक्षा जास्त नुकसान भारताने आपले ५२७ शूर सैनिक गमावले. तर या युद्धात १३६३ हून अधिक सैनिक जखमी झाले. हे असे बलिदान आहे जे कोणत्याही किंमतीत तोलता येणार नाही. या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात, उंच शिखरे काबीज करताना, अनेक तुकड्यांनी प्रत्येक इंच जमिनीसाठी आपले प्राण धोक्यात घातले.

पाकिस्तानने युद्धात झालेले नुकसान नाकारले

तर भारताच्या तुलनेत कारगिल युद्धात पाकिस्तानला भारतापेक्षा खूप जास्त लष्करी नुकसान सहन करावे लागले. काही अहवालांनुसार, या युद्धात सुमारे ३००० पाकिस्तानी सैनिक मृत्यूमुखी पडले. तर पाकिस्तानन जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानने ३५७ सैनिकांच्या मृत्युचा दावा केला होता. युद्धानंतर, जेव्हा भारतीय सैन्याने उंचावरील भाग पुन्हा ताब्यात घेतला, तेव्हा तेथे शेकडो पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आढळले. पाकिस्तानने त्यांना परत घेण्यासही नकार दिला होता. एवढेच नाही तर युद्धात पाकिस्तानच्या धोरणात्मक अपयशामुळे त्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमाही खराब झाली. लाहोर घोषणेच्या काही महिन्यांनंतर कारगिल घुसखोरी ही जगभरात विश्वासघात आणि युद्ध सुरू करण्याचा कट म्हणून पाहिली गेली.

कमकुवत लष्कर आणि आर्थिक दबाव

त्या काळात भारताची अर्थव्यवस्था मजबूत होती. परकीय चलन साठाही $३३.५ अब्ज आणि संरक्षण बजेट $१० अब्ज इतके होते. पण पाकिस्तान मात्र हे युद्ध जास्त काळ लांबवण्याच्या स्थितीत नव्हता. त्यातच युद्धाच्या काळात पाकिस्तानचा रोजचा खर्च सुमारे ३७० कोटी रुपये होता जो भारताच्या तुलनेत खूपच कमी होता. त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरी परिणाम होऊ लागला होता. पण भारताची आर्थिक तयारी आणि राजकीय स्थिरतेमुळे भारतीय सैन्य या युद्धात ठाण मांडून उभे राहिले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दबाव लष्करी शक्ती आणि आर्थिक संकटामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली.

धडे आणि सुधारणा शस्त्रे पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान

कारगिल युद्धामुळे भारतीय सैन्याच्या अनेक उणीवादेखील उघडकीस आल्या. कारगिल युद्धाच्या वेळी शस्त्रास्त्र शोधणारे रडार उपलब्ध नसल्यामुळे अनेक सैनिक शहीद झाले. या कमतरतेची जाणीव झाल्यानंतर ‘स्वाती’ रडार प्रणाली सेवेत समाविष्ट करण्यात आली, जी शत्रूच्या तोफखान्याच्या स्थानांचा अचूक शोध घेते. त्याच काळात बुलेटप्रूफ जॅकेट, नाईट व्हिजन उपकरणे आणि मूलभूत सुविधांचा अभावही प्रकर्षाने जाणवला होता, जो नंतर भरून काढण्यात आला. सध्या कारगिलसारख्या दुर्गम भागांमध्ये रस्ते व बोगदे बांधण्यात आले आहेत, ज्यामुळे सैन्य व लष्करी उपकरणांची वाहतूक अधिक सुलभ झाली आहे.

 

Web Title: Kargil vijay diwas how much did india spend in the kargil war who suffered the most losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • Kargil Vijay Diwas

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.