भारत विरुद्ध इंग्लंड (फोटो- ians)
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाची पीछेहाट होताना दिसून येत आहे. भारतीय टी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने पाच सामने गमावले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे व्यवस्थापन फलंदाजीत आणि क्रमवारीत करत असलेले बदल संघाला घातक ठरत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आज श्रेयस अय्यर, गौतम गंभीर आणि पूर्ण भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे.
भारतीय संघाला आज विजय हवा असेल तर काही चुका टाळण्याची गरज असणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी असणार आहे. भारतीय संघाने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबाबत जाणून घेऊयात. भारतीय संघात फलंदाजीत सातत्याने बदल केले जात आहेत.
1. भारतीय फलंदाजीत सातत्याने केले जाणारे बदल भारतीय संघाला भोगावे लागत आहेत. पहिल्या क्रमाकांपासून फलंदाजीत बदल करण्यात येत आहेत. मागील सामन्यात तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्या आधी अक्षर पटेल आणि हर्षित राणा यांना वरच्या क्रमाकांवर खेळण्यास पाठविल्याने भारतीय संघाला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.
2. भारतीय गोलंदाज देखील इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरले आहेत. इंग्लंडचे गोलंदाज त्यांच्या खेळपट्टीवरील पीचचा फायदा घेत आहेत. मात्र दुसरीकडे भारतीय गोलंदाज तीच फायदा घेऊ शकत नाहीयेत.
3. भारतीय संघाला तिसरी समस्या मिडल ऑर्डरमध्ये सतावत आहेत. श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, अक्षर पटेल आणि ईशान किशन पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. टॉप ऑर्डरमध्ये केवळ अभिषेक शर्मा रन्स करताना दिसून येत आहे. वैभव सूर्यवंशी देखील चांगला खेळ करत आहे, मात्र त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता न आल्याचे दिसून येत आहेत.
‘…तर त्याला खेळवू नका’; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान
भारत: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि प्रिन्स यादव.
इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जोश टंग






