
श्रेयस अय्यर भारताचा नवा टी – 20 कर्णधार
बीसीसीआयने जाहीर केला भारतीय संघ
भारत इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर जाणार
Indian T20 Cricket Team: भारतीय संघ लवकरच इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी आज बीसीसीआयने आणि निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे श्रेयस अय्यरला भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळताना दिसणार आहे.
Here's a look at #TeamIndia's squad for the Asian Games 2026 in Japan this September 👏#AsianGames pic.twitter.com/euMfmhWEcN — BCCI (@BCCI) June 6, 2026
बीसीसीआयने श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तर तिलक वर्माला उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी – 20 सामना खेळणार आहे.
आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून संधी देण्यात आली आहे. या दोन्ही सिरिजसाठी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची देखील निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वैभव भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयपीएलमधील उत्कृष्ट नेतृत्व आणि कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यर आता भारताचा पूर्णवेळ टी-२० कर्णधार बनला आहे. मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवला टी-२० संघातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
भारताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार ), तिलक वर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रिन्स यादव