
टीम इंडियाचा टी-20 कर्णधार बदलला जाण्याची शक्यता
खराब फॉर्मचा सूर्यकुमार यादवला फटका बसण्याची शक्यता
बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
BCCI On Team India: सध्या भारतात (Cricket) आयपीएलचा महासंग्राम सुरू आहे. आज आयपीएल सुरू होऊन 1 महिना पूर्ण झाला आहे. सूर्यकुमार यादव सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. मात्र त्याचा फॉर्म कुठेतरी हरवल्यासारखा दिसून येत आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा टी-20 फॉर्मटचा कर्णधार आहे. मात्र आता त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याचे कर्णधारपद जाणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
सूर्यकुमार यादवला टी-20 फॉर्मटचा राजा समजले जाते. मात्र गेल्या काही काळापासून फॉर्म त्याची साथ देत नाहीये. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली. अंतर उर्वरित सामन्यांमध्ये त्याला साजेशी खेळी करता आलेली नाही. सूर्यकुमार यादव खेळण्यासाठी आल्यावर लवकर आउट होत नसला तरी त्याला मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करता येत नाहीये.
सूर्यकुमार यादवने भारतीय संघाला या वर्षीचा टी-20 वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. मात्र आता त्याच्या खरब फॉर्मविषयी सोशल मिडियामध्ये चर्चा सुरू झाली आहे. चाहते देखील निराश झाल्याचे म्हटले जात आहे. रन होत नसल्याने त्याकहा फरक टीमच्या धावगतीवर होत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघात मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे.
सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून धावा निघत नसल्याने टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता बीसीसीआयने कर्णधार बडल्याचे ठरवले तर कोणता खेळाडू होऊ शकतो याची चर्चा सुरू झाली आहे. श्रेयस अय्यरचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे दिसत आहे. एकेकाळी हार्दिक पांड्याला प्रबळ दावेदार मानले जात होते, मात्र त्याच्या नेतृत्वातील सातत्याच्या अभावामुळे श्रेयस अय्यरने या शर्यतीत बाजी मारली आहे, अशी चर्चा सुरू आहे.
बातमी अपडेट होत आहे…