फोटो सौजन्य - बीसीसीआय
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने रविवारी, २ नोव्हेंबर रोजी रात्री आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून चमकदार ट्रॉफी जिंकली. जेतेपदाच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या विजयामुळे मोठा नफा झाला. आयसीसीने विश्वचषक विजेत्या संघासाठी ४.४८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम निश्चित केली होती, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ३९.७८ कोटी रुपये इतकी आहे.
आता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयसीसीपेक्षा जास्त बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी ५१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
एएनआयशी बोलताना देवजित सैकिया म्हणाले, “१९८३ मध्ये कपिल देव यांनी भारताला विश्वचषक जिंकून देऊन क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची आणि प्रेरणाची सुरुवात केली. आज महिलांनीही तोच उत्साह आणि प्रेरणा आणली आहे. हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने आज केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर सर्व भारतीयांची मने जिंकली आहेत. त्यांनी महिला क्रिकेटपटूंच्या पुढच्या पिढीसाठी मार्ग मोकळा केला आहे… आमच्या संघाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले तेव्हा महिला क्रिकेट आधीच पुढच्या पातळीवर पोहोचले होते…”
BCCI Secretary Devajit Saikia announces ₹51 Crore cash reward for the Indian Women’s cricket team after it won the ICC Women’s World Cup https://t.co/NkU9VOC3jB — ANI (@ANI) November 2, 2025
ते पुढे म्हणाले, “जय शाह यांनी बीसीसीआयचा कार्यभार स्वीकारल्यापासून (२०१९ ते २०२४ पर्यंत बीसीसीआय सचिव म्हणून काम केले), त्यांनी महिला क्रिकेटमध्ये अनेक बदल घडवून आणले आहेत. वेतन समतेवरही लक्ष केंद्रित करण्यात आले. गेल्या महिन्यात आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी महिलांच्या बक्षीस रकमेत ३०० टक्के वाढ केली. बक्षीस रक्कम पूर्वी २.८८ दशलक्ष डॉलर्स होती, आता ती १४ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे.
या सर्व पावलांमुळे महिला क्रिकेटला मोठी चालना मिळाली आहे. बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी – खेळाडू, प्रशिक्षकांसाठी ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आम्ही संघ आणि सपोर्ट स्टाफसोबत काम करत आहोत,” असे ते म्हणाले. भारताच्या संघाने फायनलमध्ये कमालीची सुरुवात केली आणि फायनलमध्ये भारतीय संघ जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा संघाची फिरकी गोलंदाज दिप्ती शर्मा हिने पाच विकेट्स घेऊन संघासाठी दमदार कामगिरी केली इतिहासात नाव कोरले आहे.






