चॅम्पियन ट्रॉफी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) काही दिवसांपूर्वीच आयसीसीची रँकिंग जाहीर केली होती. यामध्ये मागील वर्षाचे चॅम्पियन ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. तर भारत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीसाठी मुकाबला होईल असा अंदाज लावला जात आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) ही पाकिस्तानमध्ये होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. यासाठी आयसीसीचे पिच क्युरेटर आणि सुरक्षा टीम पाकिस्तानात पोहचली आहे.
भारताचा संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार का? अशा चर्चा आता सोशल मीडियावर रंगल्या आहेत. याचदरम्यान बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (BCCI Vice President Rajeev Shukla) या प्रश्नांचं उत्तर देऊन स्पष्ट केलं आहे. उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयची भुमिका स्पष्ट केली.
#WATCH | Delhi: On the Champion Trophy to be held in Pakistan next year, BCCI vice-president Rajeev Shukla said, “In the case of the Champion Trophy, we will do whatever the Government of India will tell us to do. We send our team only when the Government of India gives us… pic.twitter.com/TeA3dZ5Twn
— ANI (@ANI) May 6, 2024
यावेळी उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, आता चॅम्पियन ट्रॉपी आली आहे. ज्याप्रकारे आम्हाला भारत सरकार आम्हाला सांगेल त्याचप्रमाणे आम्ही भारताच्या संघाला आम्ही पाठवू, भारत सरकारचा जो निर्णय असेल त्यानुसार आम्ही निर्णय घेऊअसे त्यांनी सांगितले.