
आज आहे जागतिक सायकल दिवस
क्रीडा मंत्री मांडविया यांचा युवकांना संदेश
सायकलला जीवनाचा भाग बनवण्याचे केले आवाहन
Mansukh Madvia: आज तीन जून. 3 जून हा सर्वत्र जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देशातील (Sports) तरुणांना एक खास संदेश दिला आहे. त्यांनी सायकलिंगला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मोहीम सुरू केली आहे. आज जागतिक सायकल दिनानिमित या मोहिमेला बळ देण्यासाठी डॉ. मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे सायकल रॅलीचे नेतृत्व केले. यावेळी सायकलिंग केवळ आरोग्य नव्हे तर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मनसुख मांडविया यांची पोस्ट काय?
‘आज देशातील युवा शक्तिला मी एक आवाहन करू इच्छितो. सायकलला आपल्या जीवनाचा भाग बनवावे. हा केवळ व्यायाम नाही तर सशक्त आणि आणि चांगल्या आरोग्याची ओळख आहे. सायकलमुळे आपण फिट राहतो. आपले मानसिक आरोग्य चांगले राहते.’ सायकलिंगला दैनदिन जीवनाचा भाग बनवल्याने प्रदुषण कमी होते.
#WorldBicycleDay पर मेरी युवा साथियों से विशेष अपील… On #WorldBicycleDay, a special appeal to my young friends… pic.twitter.com/vooDaqXmZV — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) June 3, 2026
पेट्रोल डिझेलची बचत होणार आहे. त्यामुळे देशाला फायदा होईल, असे मांडविया म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाचा संदर्भ देत ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेल वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सायकलिंग हा एक प्रभावी आणि सकारात्मक उपाय आहे.
‘सायकलींचे शहर’ म्हणून पुण्याची ओळख नावापुरतीच?
एकेकाळी ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज वेगाने बदलत आहे. शहराच्या विस्तारासोबत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली, तर सायकल दैनंदिन वाहतुकीच्या मुख्य प्रवाहातून हळूहळू बाजूला पडली. मात्र वाढती वाहतूक कोंडी, वायुप्रदूषण आणि शाश्वत वाहतुकीची गरज यामुळे सायकल पुन्हा चर्चेत आली आहे.
पुणे हे शिक्षण आणि उद्योगांचे केंद्र म्हणून विकसित होत असताना हजारो विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार सायकलवरूनच प्रवास करत होते. कमी खर्च, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक वाहतूक या कारणांमुळे सायकल शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली होती. मात्र गेल्या दोन दशकांत खासगी वाहनांची संख्या वाढल्याने सायकलचा वापर लक्षणीयरीत्या घटला.