दलीप ट्रॉफीचा अंतिम सामना नक्की कुठे (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मात्र चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता यावा यासाठी, बीसीसीआयने आता अंतिम सामन्याच्या स्थळात बदल करून तो चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये हलवला आहे. दोन्ही उपांत्यपूर्व फेरीचे सामने २३ ऑगस्ट रोजी सुरू होतील, ज्यात पहिला सामना पूर्व विभाग विरुद्ध ईशान्य विभाग, तर दुसरा सामना उत्तर आणि पश्चिम विभागाच्या संघांमध्ये होईल.
PTI या वृत्तसंस्थेनुसार, दलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या स्थळातील बदलाची घोषणा करताना BCCI चे सचिव देवजित सैकिया यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये प्रेक्षकांच्या संख्येवर काही मर्यादा असल्याने अंतिम सामना चेन्नईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दलीप ट्रॉफी ही आपल्या देशांतर्गत कॅलेंडरमधील एक प्रमुख प्रथम-श्रेणी स्पर्धा आहे आणि याच कारणास्तव, चाहत्यांना स्टेडियममध्ये अंतिम सामना पाहण्याची संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे. दुलीप ट्रॉफीचे सर्व सामने थेट प्रक्षेपित केले जातील, तर एक उपांत्यपूर्व फेरीचा, एक उपांत्य फेरीचा आणि अंतिम सामना टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल.
यावेळी दलीप ट्रॉफी १५ वर्षीय सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीवर केंद्रित असेल, ज्याचा पूर्व विभागाच्या संघात समावेश करण्यात आला आहे आणि त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. ईशान किशन या संघाचे कर्णधारपद भूषणवणार आहे. मात्र वैभवने लाल चेंडूने नियमित सराव करत स्पर्धेची तयारी आधीच सुरू केली आहे.
इतर मोठ्या खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि अर्शदीप सिंग यांच्यावर बारकाईने लक्ष असेल. ऋतुराज गायकवाड पश्चिम विभागाच्या संघाचे, तर तिलक वर्मा दक्षिण विभागाच्या संघाचे कर्णधारपद भूषवतील. दरम्यान, सलग दोन आयपीएल हंगामात आरसीबीला विजय मिळवून देणारा रजत पाटीदार सेंट्रल झोन संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. यावेळी दलीप ट्रॉफी नक्की कोण गाजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






