
england vs pakistan
लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. पीसीबीने पाकिस्तानच्या स्क्वॉडमधील तब्बल ७ खेळाडूंना थेट मायदेशी परत बोलावण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे.
एजबॅस्टनमध्ये इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा तिसरा सामना रंगणार आहे. पहिल्या दोन सामन्यांतील पराभवानंतर हादरलेला पाकिस्तानी संघ या निर्णायक सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. आपल्या संघाची ढासळलेली प्रतिष्ठा सावरण्याचे मोठे आव्हान आता पाकिस्तानसमोर असणार आहे.
ENG Vs PAK: आधी लफडं करायचं अन् मग भोगायचं! तिसऱ्या टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महाभूकंप
तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ अत्यंत मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. इंग्लंडच्या संघाने संपूर्ण मालिकेत सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत मालिकेत आघाडी घेणारा इंग्लंडचा संघ तिसऱ्या सामन्यातही आपली हीच विजयी लय कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. शेवटचा सामना जिंकून पाकिस्तानला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न इंग्लंडचा संघ करताना दिसेल. तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ आपली उरली सुरलेली लआज वाचवण्यासाठी मैदानात जीवाचे रान करताना दिसून येईल. त्यामुळे हा सामना अत्यंत रंगतदार होणार आहे.
PAK Vs ENG: लाज गेल्यावर आली अक्कल म्हणून लढवली शक्कल! PCB चा ‘धडक’ स्ट्राईक; पाकिस्तानात भूकंप
सिरिज गमावल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंच्या वर्तनाची आणि शिस्तभंगाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या गंभीर आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. बोर्डाकडून अधिकृतपणे खेळाडूंच्या शिस्तभंगाचे कारण दिले जात असले, तरी पडद्यामागे हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे मानले जात आहे.